शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

गव्हापाठोपाठ आता साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 10:55 AM

१०० लाख टन निर्यातीलाच मिळणार परवानगी

- चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : गव्हाच्या निर्यातबंदीपाठोपाठ साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. केवळ १०० लाख टन साखरेच्या निर्यातीलाच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत याबाबत घोषणा केली जाईल.

युक्रेन - रशिया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या दरात वाढ झाल्याने आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशातील गव्हाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. साखरेची टंचाई नसतानाही केवळ खबरदारीचा उपाय म्हणून साखरेची मर्यादेबाहेर निर्यात होऊ नये यासाठी निर्बंध घातले जाणार आहेत. ही मर्यादा १०० ते १०५ लाख टन असेल, असा अंदाज आहे.

देशात हंगामाच्या सुरुवातीला ८५ लाख टन साखर शिल्लक होती. चालू हंगामात ३५५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. देशांतर्गत साखरेचा वापर २८० लाख टन गृहीत धरला तर १६५ लाख टन साखर शिल्लक राहते. नव्या हंगामातील साखर बाजारात येण्यास किमान ३ महिने लागतात. महिन्याला २० ते २२ लाख टन साखर देशात लागते. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला तीन महिन्यांची म्हणजेच ६० ते ६५ लाख टन साखर शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यामुळे १६५ लाख टनपैकी १०० टन साखरेच्या निर्यातीलाच परवानगी द्यावी. 

यापेक्षा जास्त निर्यात केल्यास देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळेच केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे.  ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ८५ लाख टनपेक्षा जादा साखर निर्यातीचे करार झाले आहेत. सुमारे ७१ लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार