शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

‘आरटीओ’त हेल्मेट सक्ती  : अजित शिंदे, ३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:39 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी  मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केली. जे परिवहन अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे‘आरटीओ’त हेल्मेट सक्ती : अजित शिंदे ३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी  मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केली. जे परिवहन अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते ताराबाई पार्कातील परिवहन कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागप्रमुख प्रा. पी. डी. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. रविवार (दि. १०) पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.अजित शिंदे म्हणाले, बिहार, तमिळनाडूमध्ये हेल्मेटसक्ती आहे; पण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत हेल्मेट सक्ती नाही. आपली सुरक्षा, आपल्या हाती आहे. आपल्याला सुधारायचे असेल, तर आपण स्वत: सुधारले पाहिजे, तरच समाज सुधारेल आणि आपणही सुखी व्हाल. १९८५ ला त्याकाळी अत्याधुनिक पद्धतीच्या दुचाकी, चारचाकी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वाहनांची संख्या वाढली; परंतु, रस्ते वाढले नाहीत. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक केले. तसेच जे अधिकारी, कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर परिवहन व पोलीस विभागातर्फे कारवाई करू.अनिल गुजर म्हणाले, केवळ सात दिवस रस्ते सुरक्षा अभियानात वाहनांचे नियम पाळू नका. ते कायमस्वरूपी पाळावे, तरच रस्ते सुरक्षा अभियानाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल. यावेळी पी. डी. गायकवाड यांनी वाहतूक नियमांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्पीडवर नियंत्रण ठेवले पाहिजे, मनाचा वेग वाढवू नका. हेल्मेटसक्ती होणे गरजेचे आहे.

आपण नियम पाळूनसुद्धा चुका करूनये, असा सल्ला दिला. यानंतर मिशन डिफेन्स ड्रायव्हिंग स्टिकर्स वाहनांवर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी चारचाकी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती उपस्थित होते. वरिष्ठ मोटारवाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. साहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर