शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

दिवसा विजेसाठी मोजावे लागणार रोजचे चार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 11:39 AM

शेतीला दिवसा वीज पुरवण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची तर महावितरणला खासगी कंपन्याकडून रोज दोन हजार मेगावॅट वीज घ्यावी लागणार

नसिम सनदी

कोल्हापूर : शेतीला दिवसा वीज पुरवण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची तर महावितरणला खासगी कंपन्याकडून रोज दोन हजार मेगावॅट वीज घ्यावी लागणार आहे. त्यासाठी दर दिवशी चार कोटी याप्रमाणे महिन्याला १०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीनेच तयार केलेल्या प्रस्तावातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार हा भार उचलणार का, यावरच दिवसा विजेच्या निर्णयाचे भवितव्य अवलंबून आहे.

या प्रस्तावामुळे दिवसा वीज देणे आर्थिकदृष्ट्या व वहनक्षमता, निर्मितीच्या तुलनेत कितपत शक्य आहे याचा आता नव्याने अभ्यास सुरु झाला आहे. आयआयटीच्या तज्ज्ञ समितीमार्फत या प्रस्तावावर आठ दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. सरकारला दिलेल्या या प्रस्तावात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवायची तर ५ हजार ६१९ मेगावॅट विजेच्या विभागणीचा आधी विचार करावा लागतो. १५ स्लाॅटमध्येच पण पहाटे ४ ते रात्री ११ या वेळेत शेतीचे वेळापत्रक बसवता येते, शिवाय महावितरणची आहे ती यंत्रणादेखील ढेपाळणार नाही हे आकडेवारीसह सिध्द करुन दाखवण्यात आले आहे. सध्या दिवसा २२ हजार मेगावॅट विजेची मागणी आहे, शेतीची त्यात भर टाकली तर ती २८ हजार मेगावॅटपर्यंत जाईल.

खरेदी १० रुपये,विक्री १ रुपये ७६ पैसे

पावसाळ्यात कृषीपंप बंद असतात. साधारपणे डिसेंबरनंतरच हा पुरवठा सुरु होतो. म्हणजेच केवळ ६ महिने शेतीसाठी वीजपुरवठा करावा लागतो. त्यातही मार्च ते मे या तीन महिन्यात शेतीसाठीची मागणी जास्त असते. सध्या असणारी वीजनिर्मिती पाहता २ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवतो. तो खासगी कंपन्यांकडून खरेदी केल्यास जास्त मागणीच्या काळातील विजेचा दर द्यावा लागतो, त्यासाठी प्रतियुनिट १० रुपये मोजावे लागणार आहे. सरकार महावितरणला अनुदान देऊन शेतीसाठी १ रुपये ७६ पैसे या सवलतीच्या दराने वीज पुरवते. जास्त दराने वीज खरेदी करायची म्हटली तर दिवसाला ४ कोटीप्रमाणे पुढील अडीच महिन्यांसाठी २५० कोटी रुपयांची व्यवस्था सरकारला करावी लागेल.

तास वाढवण्यासाठीही द्राविडी प्राणायाम

वीज किती तास द्यायची याचे अधिकार वीज नियामक आयोगाकडे असतात. ८ ऐवजी १० तास वीज द्यायची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे, मग त्यांच्याकडून आयोगाकडे पाठवावा लागतो. हा द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी २५० कोटी रुपये खर्च करणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कठीण असले तरी अशक्य नाही. मंत्र्याची दालने, त्यांच्यावरचा खर्च कमी केला तर ही रक्कम उभी राहू शकते. शेतकऱ्यांसाठी म्हणून सरकारने हा भार उचलायला हवा. -राजू शेट्टी, माजी खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजmahavitaranमहावितरण