शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

‘न्यूट्रियंट्स’च्या साखर विक्रीतून एफआरपी -: १५ जुलैला जाहीर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:40 AM

‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बँक, अथर्व कंपनीचा निर्णय

कोल्हापूर : ‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा जाहीर लिलाव १५ जुलैला जिल्हा बँकेच्या मुख्यालयातच दुपारी एक वाजता होणार आहे. तशी जाहीर नोटीस गुरुवारी जिल्हा बँकेने प्रसिद्धीस दिली आहे.

जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्यूट्रियंट्स कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. कंपनीने २०१६-१७ या गळीत हंगामात १ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. ही तयार झालेली साखर जिल्हा बँकेकडे तारण ठेवून कंपनीने कर्ज उचलले होते. या कर्जातूनच शेतकऱ्यांची एफआरपी भागविण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पुढील एफआरपी भागविण्यास कंपनीने असमर्थता दर्शवल्याने न्यूट्रियंट्सचा जिल्हा बँकेसोबतचा भाडेकरार संपुष्टात आला होता.

यानंतर नव्याने भाडेतत्त्वाची निविदा प्रक्रिया राबवून अथर्व इंटरट्रेड कंपनीला हा कारखाना चालविण्यास देण्यात आला. यावेळी बँक आणि कंपनीने एकत्रितपणे ही ‘एफआरपी’ची रक्कम अदा करावी, असे ठरले होते. त्यानुसार कंपनी व बँक यांनी संयुक्तपणे प्रादेशिक साखर सहसंचालक, चंदगड तहसीलदार आणि शेवटी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकºयांची यादी मागणी केली होती. तथापि आजअखेर ही यादी मिळालेली नाही; पण शेतकºयांची होणारी आर्थिक अडचण ओळखून बँकेने कर्जापोटी तारण असलेली साखर विक्री करून एफआरपी भागविण्याचा निर्णय घेतला आहे.नुकसान होण्यापेक्षा शेतकºयांना फायदातारण म्हणून असलेली साखर ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने ती भिजून नुकसान होण्यापेक्षा ती विकली तर शेतकºयांना तरी तिचा लाभ होईल, असा विचार जिल्हा बँकेने केला आहे. म्हणून साखर विक्री जाहीर लिलावाद्वारे काढण्याची नोटीस काढल्याची माहिती जिल्हा बॅँकेने कळवली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने