शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

एक रुपये पीकविमा योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील 'हे' तालुके आघाडीवर, ऊस पट्ट्यात प्रतिसाद कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 3:42 PM

यंदा १५ हजार हेक्टरवरील पिकांना मिळणार विमा कवच

कोल्हापूर : सरकारच्या वतीने यंदा एक रुपयात पीकविमा योजना आणली, त्याला जिल्ह्यातून तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला. ५५ हजार ३०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदवला असून, ‘राधानगरी’, ‘आजरा’ व ‘चंदगड’ तालुके आघाडीवर राहिले आहेत. १५ हजार हेक्टरवरील पिकांना यंदा विमा कवच मिळणार असून, ऊस पट्ट्यात शिरोळ, कागल तालुक्यात प्रतिसाद कमी दिसत आहे.नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत येतो. त्यातून सावरण्यासाठी सरकारच्या वतीने पीकविमा योजना गेल्या अनेक वर्षापासून राबवली जाते. मात्र, त्याचा हप्ता व जोखीम पाहता शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवत होते. यासाठी यंदाच्या खरीप हंगामापासून सरकारने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे. शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घ्यायचा आणि त्याचे लाभ पूर्वीप्रमाणेच दिले जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीच्या पीकविमा योजनेप्रमाणे त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.मात्र, कृषी विभागाने गावोगावी प्रबोधन केल्यानंतर शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. त्यामध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्यातील ५५ हजार ३०७ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला. यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एक रुपयांप्रमाणे ५५ हजार २६७ रुपये घेतले, तर राज्य सरकारने २ कोटी ६६ लाख ४९ हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला दिला आहे.९० टक्के अल्पभूधारक शेतकरीपीकविम्यात ९० टक्के म्हणजेच ४९ हजार ८५४ शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. उर्वरित शेतकरी हे मोठे आहेत, यावरून लहान शेतकऱ्यांनाच विमा संरक्षणाची गरज अधिक दिसते.

तालुकानिहाय सहभागी शेतकरी व क्षेत्र हेक्टरमध्ये

तालुका - कर्जदार - बिगरकर्जदार - क्षेत्रआजरा           - १४   - ५२२४  -  १३०३गगनबावडा   - ११    - २७७१  -  ८१०भुदरगड        - ८०   - १९५० -   ४७९चंदगड          - १७१   -७२६१  - २५७६गडहिंग्लज     - १३   - ६५३५  -  १९४१हातकणंगले   - १३  -  ४३०३  -   १५२०कागल           - ३५   - २८२५   - ९०८करवीर          - ९     -  ६१०१ -   १३७७पन्हाळा         - ३१   -  ३८२१  -   ८२१राधानगरी      - २३  -  ८०८६  -  १६२८शाहूवाडी       -  ३३ -  ३०४३   - ७६६शिरोळ           - ०    -  ३००४  -  १३७५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी