शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा पुन्हा सुरू; शासन भरते विम्याचा हप्ता, 'इतकी' मिळते मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 4:23 PM

प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करण्याचे कृषी विभागाने दिले आदेश

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजना नव्याने सुरू केली आहे. एप्रिल २०२२ पासून ही योजना खंडित झाल्याने राज्य पातळीवर हजारो प्रस्ताव मदतीच्या प्रतीक्षेत होते. या प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब अडचणीत येते. यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात योजना सहा वर्षांपूर्वी सुरू केली होती. विम्याचा हप्ता शासन भरते. या योजनेनुसार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांपर्यंत मदत दिली जाते. त्याचबरोबर एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, हिस्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

काय आहेत निकष मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर सात/बारा उतारा बंधनकारकशेतकरी १० ते ७५ या वयोगटातील असावा.

कोठे संपर्क साधावा शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजीकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.

जिल्ह्यात ११५ प्रस्ताव पडूनएप्रिल ते ऑगस्ट २०२२ अखेर योजना खंडित झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ११५ प्रस्ताव कृषी विभागाकडे आहेत. त्याची पडताळणी करून त्यांना लाभ देण्यात येणार आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीGopinath Mundeगोपीनाथ मुंडे