शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

 शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल येणार; १८ डिसेंबरला सोहळा  

By संदीप आडनाईक | Updated: December 6, 2023 19:59 IST

शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त समारंभ येत्या १८ डिसेंबर रोजी होणार असून या समारंभाला यंदा राज्यपाल तथा कुलपती डॉ. रमेश बैस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई.) या राष्ट्रीय नियामक संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एस.एस. मंथा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी बुधवारी येथे दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते, परंतु यावेळी ते येउ शकले नव्हते. दरम्यान, या सोहळ्यात ४९,४३८ पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. शंकर मंथा यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत शैक्षणिक व नागरी प्रशासन क्षेत्रातील अनेक सन्मानाची पदे भूषविली आहेत. मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. संस्थेमध्ये रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व कंट्रोल थिअरी या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याखेरीज, आय.बी.एम., पॉकिप्सी (न्यूयॉर्क) या अमेरिकन कंपन्यांमध्येही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांतून त्यांचे २८० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. 

त्यांच्या नावावर तीन पुस्तकेही आहेत. ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ (एनएसक्यूएफ) आणि ‘ब्लेंडेड लर्निंग’ नियमावलीचे ते उद्गाते आहेत. याशिवाय कर्नाटक स्कील डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे सदस्य आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागारही ते आहेत. एसएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि के.एल. विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते ‘महाप्रीत स्टार्टअप नॉलेज सेंटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स्ड स्टडीज्, बेंगलोर या संस्थेत ॲडजंक्ट प्राध्यापक, नॅशनल सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी स्टॅंडर्ड्स (एनसीएसएसएस) संस्थेच्या तांत्रिक समितीचे चेअरमन आणि महाराष्ट्र शासनासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणून काम पाहात आहेत. यंदा पदवी घेणाऱ्यांमध्ये मुलींची सख्या लक्षणीय दरम्यान, या समारंभात ४९,४३८ पदव्या प्रदान करण्यात येणार असून यंदा पदवी ग्रहण करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या २७,४७५ इतकी लक्षणीय आहे अशीही माहिती कुलगुरु डॉ. शिर्के यांनी दिली.गतवर्षीही पदवी घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRamesh Baisरमेश बैस