शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

जिल्ह्यातील ८८० ग्रामपंचायतींच्या आज ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:25 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७९२ कोरोनामुक्त गावे व पाचपेक्षा कमी रुग्ण असलेल्या ८८ अशा एकूण ८८० गावांमध्ये आज स्वातंत्र्यदिनी ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७९२ कोरोनामुक्त गावे व पाचपेक्षा कमी रुग्ण असलेल्या ८८ अशा एकूण ८८० गावांमध्ये आज स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा घेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तर ५ पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या १० तालुक्यांतील १४५ गावांमध्ये ग्रामसभा घेता येणार नाही.

सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के असून, १०२५ पैकी ७९२ गावे कोरोनामुक्त आहेत. ८८ गावांत ५ पेक्षा कमी रुग्ण आहेत. या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांना नियम व अटी घालून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकाच रजिस्टरवर सह्या न घेता प्रत्येकाला स्वतंत्र पान देण्यात यावे, मोठ्या पटांगणात ग्रामसभा घ्यावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सक्रिय रुग्ण कमी आहे अशा प्रतिबंधित क्षेत्रातील व घरातील व्यक्तींना तसेच ५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावातील नागरिकांना ग्रामसभेला उपस्थित राहता येणार नाही. सभेच्या ठिकाणी, शारीरिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर अशा नियमांचे पालन केले जावे अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

----

तालुका : ५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावांची संख्या

करवीर : ३३

शिरोळ : २७

हातकणंगले : २१

गडहिंग्लज : १८

पन्हाळा : १७

कागल : १०

शाहूवाडी : ७

चंदगड : ५

राधानगरी : ५

आजरा : २

-------------