शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार- पालकमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 14:13 IST

rain, farmar, satejpatil, minister, kolhapurnews अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार : पालकमंत्री पाटील यांचा इशाराचंदगड तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी, पंचनाम्याचे दिले आदेश

कोवाड : अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पालकमंत्र्यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, कालकुंद्री, हुंदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी कोवाड येथे बैठक घेतली. बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील पिकांचे नुकसान आणि पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.पालकमंत्री म्हणाले, ३० आॅक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा. त्याबाबत शेतकऱ्यांना आदल्यादिवशी निरोप द्या, गावांमध्ये दवंडी द्या. भरपाई देण्यासाठी शासन पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सहकार्य करावे.यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, संभाजी देसाई, अशोकराव देसाई, दुंडगे सरपंच राजेंद्र पाटील, कल्लाप्पा भोगण, अरुण सुतार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोदरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम आदी उपस्थित होते.पडलेला ऊस आधी गाळाशेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही संबंधित कारखान्याना पाठवावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

शेतकरी महिलेशी संवादभाताचे नुकसान झालेल्या कर्यात भागातील रुक्मिणी गोविंद गिरी या शेतकरी महिलेशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या दुसऱ्याचे शेत कसायला घेतले होते. पावसामुळे संबंध पीक वाया गेले. काळजी करु नका, सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा पालकमंत्र्यांनी त्यांना दिला.

पुलाबाबत लवकरच बैठकदुंडगे आणि कुदनूरला जोडणाऱ्या धोकादायक पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. संरक्षित कठडा नसल्याने झालेल्या दुर्घटनांची माहिती आमदार पाटील यांनी दिली. पुलासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलministerमंत्रीkolhapurकोल्हापूर