शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

दूध उत्पादनात मोठी घट

By admin | Published: April 29, 2016 12:06 AM

वीस हजार लिटर घटले : उष्माघाताने वासरे कासावीस; जनावरांचा प्रश्नही गंभीर

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --पाणीटंचाईच्या झळा केवळ पिकांना सहन कराव्या लागत नाहीत, तर त्याचा परिणाम वाड्या-वस्त्यांवरील जनावरांच्या दूध उत्पादनासह आरोग्यावर झाला आहे. सुक्या चाऱ्यामुळे शरीराला पाण्याची गरज जास्त असते, त्यात जीवघेण्या उष्म्याने तर दिवसातून चारवेळा पाणी दिले तरी ते जनावरांच्या दृष्टीने कमीच असते. वाड्या-वस्त्यांवर माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तिथे जनावरांचे काय? याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून जिल्ह्याच्या दूध संकलनात गत महिन्यापेक्षा सुमारे वीस हजार लिटरने घट झाली आहे. कोल्हापूर जिल्'ात शेतीला जोडधंदा म्हणून उद्यास आलेल्या दूध व्यवसायाने अलीकडील दहा वर्षांत प्रमुख व्यवसाय म्हणून मान्यता मिळविली आहे. बेभरवशाच्या शेतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दूध व्यवसायाने आधार दिला. दहा दिवसाला न चुकता दुधाचे पैसे हातात येत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात या व्यवसायाचा खूप मोठा वाटा आहे. जिल्'ात ११ लाख ५४ हजार गाय , म्हैस वर्ग जनावरे व शेळ्या-मेंढ्या आहेत. जिल्'ात प्रामुख्याने ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘शाहू’च्या माध्यमातून सरासरी १५ लाख लिटर दूध संकलन सुरू आहे. पाणीटंचाईमुळे उसासह इतर पिके जाणार हे निश्चित आहे, त्यात दूध व्यवसायही अडचणीत आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्'ात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर नसला तरी वाड्या-वस्त्यांवर जिथे जिवंत झऱ्यांवर पाणीपुरवठा अवलंबून आहे, तिथे प्रश्न गंभीर बनला आहे. झरे व लहान तळी आटल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात वाड्या-वस्त्यांवर सुका चाराच जनावरांसाठी आता उपलब्ध आहे. सुका चारा व पुरसे पाणी नसल्याने दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. (उत्तरार्ध)‘गोकुळ’चे गत महिन्यापेक्षा दूध कमीच‘गोकुळ’ चे गत वर्षीपेक्षा यंदा सरासरी दूध संकलन जास्तच दिसते, हे जरी खरे असले तरी यंदा संकलन वाढीसाठी संघाने विविध कार्यक्रम राबविल्याने सुरुवातीपासूनच संकलनात वाढ दिसते. गत महिन्याच्या तुलनेत पाहिले तर त्यांचे दहा हजार लिटर तर ‘वारणा’ व इतर संघाचे संकलनावर दुष्काळाचा परिणाम दिसतोच.