शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोल्हापूर-कटिहार एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, पहिल्याच रेल्वेला प्रवाशांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:55 IST

पुढच्या तिन्ही गाड्यांचे आरक्षण फुल्ल

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मध्य रेल्वेच्याकोल्हापूर-कटिहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसला रविवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून उद्योजक हरीश जैन यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडी सोडण्यात आली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना कोल्हापूर ते कटिहार क्रमांक (गाडी क्रमांक ०१४०५/०१४०६) ही साप्ताहिक विशेष रेल्वे सोयीची आहे. या आठवड्यासाठी ही गाडी हाउसफुल्ल झाली आहे.कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुहास गुरव, स्थानकप्रमुख आर. के. मेहता, रेल्वे प्रवासी संघटनेचे समन्वयक अनिल तराळ, प्रशांत चौगुले, जितेश कारेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.तत्पूर्वी रेल्वेच्या इंजिनला हार घालून मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. यावेळी या रेल्वे गाडीचे सारथ्य करणारे कोल्हापूरचे सुपुत्र मिलिंद उलपे यांचा या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत हा मुद्दा उपस्थित करून खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेकडे याबाबत पाठपुरावा केला होता.

चार फेऱ्या होणार, सर्वांचे आरक्षण फुल्ल..कोल्हापुरी–कटिहार व कटिहार–कोल्हापूर या मार्गावर प्रत्येक चार फेऱ्या होणार आहेत. ही गाडी सांगली, पुणे, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारस, जबलपूर, प्रयागराज छावकी, अयोध्या जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर, बेगुसराय या प्रमुख स्टेशनवर थांबणार आहे. यामुळे कोल्हापुरातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. या गाडीच्या सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल झाले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद बघता या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे सोडण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBiharबिहारrailwayरेल्वेpassengerप्रवासी