शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

ग्रामीण भागातही गुटखा निर्मितीचे केंद्र

By admin | Published: September 17, 2015 9:55 PM

शिरोळ तालुका : मुळाशी जाऊन तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

संदीप बावचे -- जयसिंगपूर  इचलकरंजी येथील गुटखा कारवाईची घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथे गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटखाप्रकरणी कारवाई केल्याने पुन्हा एकदा नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर जरब बसविली, तरच अवैध गुटखा निर्मिती केंद्रांवर चाप बसणार आहे.  इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील गुटखा निर्मिती व विक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. शहरालगतच कर्नाटक राज्याची हद्द असल्याने तेथून सहजासहजी गुटखा उपलब्ध होत असल्याचे मिळालेल्या माहितीतून पुढे आले आहे. या तस्करीतूनच इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागाला याची लागण लागली आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये अवैध गुटखा निर्मितीचे केंद्र पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची घटना ताजी असतानाच इचलकरंजी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंडिग्रे येथे मंगळवारी (दि. १५) जयसिंगपूर पोलिसांनी गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून गुटखा मिक्सिंग करणाऱ्या दोन मशिनरींसह विमल, डीडी, सागर अशा गुटख्यांचे पाऊचदेखील जप्त केले. यातील मुख्य सूत्रधार विलास जमदाडे (हरीपूर) व कुमार कचरे (कोंडिग्रे) हे दोघे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय परप्रांतीय कामगार मिळून आल्याने संशयितांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. गुटखा तयार करण्यासाठी कर्नाटकातून कच्चा माल आणून तो याठिकाणी पक्का करण्यात येत होता. विशेष म्हणजे या गुटख्याच्या पाऊचवर ठिकाण, तारीख अथवा इतर कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तरीही बाजारामध्ये खुलेआम तो विकला जात होता. याचा तपास करण्याचे आवाहन जयसिंगपूर पोलिसांसमोर आहे. अवैध गुटखा निर्मितीचे कारखाने आता ग्रामीण भागातही पोहोचू लागल्यामुळे यावर जरब बसविणार तरी कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो आता नावापुरताच शिल्लक राहत आहे. कारवाईनंतर संशयित जामिनावर पुन्हा मोकाट सुटतात व नव्याने गुटखा निर्मितीचा उद्योग सुरू होतो. हे इचलकरंजीतील कारवाईने स्पष्ट झाले आहे. येथील कारवाईनंतर गुटखा हद्दपार होईल, अशी अशा असतानाच कोंडिग्रे येथील कारवाईतून पुन्हा ही यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.कायद्यातील पळवाटा संशयितांच्या पथ्यावरकायद्यातील पळवाटेमुळे संशयित आरोपी मोकाट सुटतात. कारवाईनंतर त्यांना ठोस शिक्षा होत नाही. यामुळे उत्पादकांना काहीच भय उरलेले नाही. त्यामुळे पुन्हा गुटखा उत्पादन जोमात सुरू असल्याचे वास्तव आहे.कर्नाटकातून कच्च्या मालाची आवककर्नाटकातून कच्चा माल आणण्यात आल्याचे कोंडिग्रे येथील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. यामुळे हा कच्चा माल पुरविणाऱ्या यंत्रणेचे उच्चाटन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. शासनाने बंदी घातल्यामुळे गुटख्याच्या किमतीत भरमसाठ वाढ करून उत्पादकांनी चांगलीच कमाई केली. यामुळे आजही परिसरात गुटखा राजरोसपणे मिळत असल्याचे चित्र आहे.