शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

हरिश्चंद्राचा नव्हे भाजपचा जमाना

By admin | Published: December 07, 2015 12:13 AM

राजू शेट्टींची उद्विग्नता : मंत्रिमंडळ विस्ताराचा चाप्टर ६ महिन्यांपूर्वीच बंद

कोल्हापूर : हरिशचंद्राच्या राज्यात स्वप्नातील ही खरे व्हायचे पण आता तर भाजपचे सरकार आहे, हरिशचंद्राचे नव्हे, अशी उद्विग्नता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा चाप्टर आपल्या पातळीवर सहा महिन्यांपूर्वीच बंद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकरकमी एफआरपी व आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. खासदार राजू शेट्टी म्हणाले, हा विषय माझ्या पातळीवर सहा महिन्यांपूर्वीच बंद झाला आहे. त्यावर आता काही बोलणार नाही; पण एवढे सांगावेसे वाटते, पूर्वी हरिशचंद्राच्या राज्यात स्वप्नातील गोष्ट ही खरी व्हायची, पण भाजप सरकारच्या जमान्यात दिवसा-ढवळ्या दिलेल्या वचन पाळले जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानाशी बोलणार नाही, माझ्यादृष्टीने ऊसदराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यांनी कारखानदारी मोडीत काढली, त्यांनाच सोबत घेऊन भाजप सरकार काम करत आहे. सरकार आमचे पण सल्ला देणारे गडी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. आम्ही मात्र दाराबाहेर असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विधानपरिषदेत पत्ते खुलेराज्याच्या राजकारणात भाजप आमचा जवळचा मित्र आहे. भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांचा उमेदवार नसेल तर आमचे पत्ते खुले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सरकारकडून शेतकऱ्यांचा अनादरभ्रष्टाचारी कारखानदारांची चौकशी लावून त्यांच्या हातात बेड्या ठोकतील म्हणून शेतकऱ्यांनी मतपेटीद्वारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील संताप व्यक्त केला; पण सध्या सरकारच्या हालचाली पाहता शेतकऱ्यांच्या मतांचा अनादर सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली.सदाभाऊंचे तोंडावर बोटऊसदर आंदोलनाबाबत संपूर्ण माहिती शेट्टी यांनीच सांगितली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सदाभाऊ खोत यांना विचारले असता, त्यांनी तोंडावर बोट ठेवत शेट्टींकडे बोट केले.