शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगलेमध्ये शिंदे गट उमेदवार बदलणार का? धैर्यशील मानेंनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:54 IST

Hatkanangle Lok Sabha Election : शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे .

Hatkanangle Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये उमेदवार यादी जाहीर झाली असून काही जागांसाठी अजूनही बैठका सुरू आहेत. दरम्यान, शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे, यावर खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली. 

Hatkanangle Lok Sabha Election : 'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'; धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींवर हल्लाबोल

"शिरसाट यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कुठेही उमेदवार बदलणार असल्याचे संकेत  दिलेले नाहीत. त्यांनी असं सांगितलं आहे की, बदलायचे असेल तर मला अशी कोणतीही कल्पना नाही. पण, बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आहेत. हे स्टेटमेंट म्हणजे बदलण्यासाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव त्यांनी घेतलेलं नाही. पण, चर्चेचं उधाण एखाद्या मतदारसंघाबाबत करणे हे योग्य नाही, असं धैर्यशील माने म्हणाले. 

"शिवसेनेला जर उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याआधी बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही. मी स्वत: एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आश्वस्त करतो, शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक कामात गुंतला आहे. भाजपाचे कार्यकर्तेही कामात गुंतले आहेत. आता गती घेण्याची वेळ आहे. संभ्रम करण्याची वेळ नाही, कालची बातमी एप्रिल फुल म्हणून डोक्यातून काढून टाकावी. कार्यकर्ता म्हणून जे काम करायचं आहे, त्या कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे. कामाला लागण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. माझ्या पार्टीने उमेदवारी दिल्यानंतर हा सिग्नल दिला आहे, त्यामुळे आता या शंका काढण्यात काही अर्थ नाही, असंही धैर्यशील माने यांनी सांगितलं. 

'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'

"यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत. पण, दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही. ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात.त्यामुळे ते आयडॉलॉजीकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्ट्रोरियल युतीकडे लक्ष देतात, मी कसा निवडून येईल. एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला. 

टॅग्स :dhairyasheel maneधैर्यशील मानेShiv Senaशिवसेना