शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय ?, राजू शेट्टींची विचारणा

By समीर देशपांडे | Published: October 07, 2024 5:51 PM

'शरद पवारही आतून तिकडचे'

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ दोन, अडीचशे घराण्यांमध्येच सुरू आहे. त्या पलिकडे सामान्य परंतु नेतृत्व करू शकणाऱ्या नव्या चेहऱ्यांना सोबत घेवून आम्हांला या घराण्यापलिकडे राजकारण न्यायचे आहे. आघाडी आणि युती'त आलटून, पालटून दोन्हीकडे तीच तीच माणसे दिसतात. त्यामुळेच आम्ही हा तिसरा पर्याय काढला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.साखर हंगामाबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या ऊसाला अजूनही २०० रूपये मिळावेत यासाठी आमचा लढा सुरू आहे. गेल्यावर्षभरात साखरेचे भाव ३६०० रूपयांपर्यंत राहिले आहेत. मोलॅसिस, इथेनॉल, बगॅसचे दरही वाढले. त्यामुळे माळेगाव, विठ्ठल साखर कारखान्याला जर ३६०० रूपये देता येतात तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातल्या धनदांडग्या साखर कारखानदारांना काय धाड मारली आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 'कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय' १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करायचे असताना बॉयलर पेटले आहेत. त्याआधी कारखाने सुरू झाले तर नियमाप्रमाणे रोज प्रतिटन ५०० रूपयांचा दंड सरकारने वसूल केला पाहिजे. अन्यथा कारखानादार आमचे ऐकत नाही असे सरकारने तरी जाहीर करायला पाहिजे. कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. आम्ही काय करायचे ते ठरवले आहे. महिनाभर आधी ऊस परिषद घेत आहोत. नाही तरी आम्ही ऊसाचा बुडका तयार ठेवलाच आहे असे ते म्हणाले.'शरद पवारही आतून तिकडचे'हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते आणि ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळ इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीGovernmentसरकारSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण