शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

कोल्हापुरात गडगडाटासह तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:10 IST

कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापुरात गडगडाटासह तासभर जोरदार पाऊसपिकांची तहान भागणार: लोकांची उडाली तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.गेले दोन दिवस रात्री व पहाटेही गार वारे वाहत होते. थंडीही सुुरू झाली होती. त्यामुळे पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की काय, अशी भीती व्यक्त होत होती. दुपारी तीनच्या सुमारास आभाळ दाटून आले. ढगांचा गडगडाटही वळिवासारखा होता. बघता-बघता जोरदार पाऊस सुरू झाला. तापलेला मातीचा गंध आसमंतात भरून गेला. तासभर हा पाऊस सुरू राहिला तरी रिपरिप मात्र बंद झाली नव्हती.एवढ्या लवकर पाऊस जाणे परवडणारे नव्हते; कारण पिकांना अजूनही पावसाची गरज आहे. यंदाच्या हंगामात जूनमध्ये सुरू झालेला पाऊस मध्ये थांबलाच नाही. तब्बल ५० दिवस तो एकसारखा पडत होता. त्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त होऊन गेले होते. पिकांची वाढही थांबली होती. ‘नको आता पाऊस’ असे म्हणण्याची वेळ आली होती. हा पाऊस आॅगस्टच्या अखेरीस थांबला. तो असा थांबला की आॅक्टोबरसारखा उन्हाचा तडाखा सुरू झाला.

सुरुवातीला पंधरा दिवस पिकांनाही ते पोषक होते; परंतु जसजशी उघडीप वाढली तशी पिके अडचणीत येऊ लागली होती. आता जिल्ह्यात भात पोटरी भरण्याची स्थिती आहे. सुरुवातीला धूळवाफ पेरणी झालेले भात बाहेर पडले आहे. भुईमूगही शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनची काढणी मात्र अनेक ठिकाणी सुरू झाली आहे. ऊस वाळू लागला नसला तरी त्यालाही पाण्याची गरज होती. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडविली तरी सर्व प्रश्न निसर्गाने एका तासात सोडविले. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊसkolhapurकोल्हापूर