शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

‘हनीमूनला जायचं हाय, दोघांना ई-पास हवाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:18 AM

कोल्हापूर : ‘नुकतच लग्न झालंय महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, दोघांना ई-पास हवाय’ अशा मागणीचे कारणं देऊन जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कोल्हापूर ...

कोल्हापूर : ‘नुकतच लग्न झालंय महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, दोघांना ई-पास हवाय’ अशा मागणीचे कारणं देऊन जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलकडे ऑनलाइन ई-पाससाठी परवानगी मागणी करण्यात आली, अशा पद्धतीने हास्यास्पद कारणे टाकून ई-पासची मागणी सायबर सेलकडे होत आहे. पण प्रत्यक्षात फक्त लग्नसमारंभ, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार याच कारणासाठी सेलकडून ई-पासला हिरवा कंदील दाखवला जात आहे. लॉकडाऊनच्या चाळीस दिवसांत तब्बल ६७ हजार ५०२ जणांनी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पाससाठी सायबर सेलकडे अर्ज केले.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पास अनिवार्य केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी रोज किमान अडीच हजार ई-पासची मागणी सायबर सेलकडे होत आहे. रक्तातील नातेवाईकाचे निधन, जवळच्या नातलगाचे लग्न, रुग्णाला उपचाराला नेणे हीच सबळ कारणे व त्यासोबतची कागदपत्रे सायबर सेलच्या वेबसाईटवर डाऊनलोड करावीत, त्यांनाच जिल्हाबाहेर जाण्यासाठी परवाना दिला जाईल, असे पोलीस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले. पण या कारणाशिवाय, नवीन लग्न झालं आहे. महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, पाहुण्यांच्या साखरपुड्याला जायचं आहे, पत्नीला पुण्याला भेटायला जायचं आहे, अशी हास्यास्पद कारणे देऊनही ई-पासची मागणी केली. अशा कारणांसाठी ई-पास नाकारले आहेत. खोटी कारणे देऊन ई-पास मागणा-यांची संख्या मोठी असल्याचे दिसले.

जिल्ह्यात लॉकडाऊन लागलेल्या २३ एप्रिल ते २ जून या कालावधीत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६७ हजार ५०२ जणांनी अर्ज केले आहे. त्यापैकी सबळ कारण असल्याने फक्त ९६४० अर्जदारांना जिल्ह्याबाहेर जाण्यास परवाना मंजूर केला. तर ५७ हजार ८६२ अर्ज नाकारले. कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी सर्वात जास्त ई-पासची मागणी होत आहे.

डॉक्टरांकडे विचारपूस

रुग्णाला उपचारासाठी परजिल्ह्यात न्यायचे कारण सांगून परवानगी मागतात. पण कारणांबाबत शंका आल्यास संबंधित हॉस्पिटलकडे फोन करून अपॉइंटमेंट घेतल्याची खात्री करूनच ई-पास निर्गत केला जातो. अनेक अर्जदारांनी एकाच व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट जोडून नातेवाईकांच्या अंत्यसंस्कराला जाण्याचे कारण दाखवल्याचेही उघड झाल्याचे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

फक्त महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ईं-पास परवाना

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासला मंजुरी देण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. त्यामुळे कर्नाटक अथवा गोवा राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ई-पासला मंजूर दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यातून बेळगाव, निपाणी भागात जाण्यासाठीही ई-पासला मोठी मागणी होती. पण त्यांना फक्त कोगनोळीपर्यंतच प्रवेशाला मंजुरी दिली.

२३ एप्रिल ते २ जूनपर्यंत ई-पास

- मागणी अर्ज : ६७.५०२

- मंजूर अर्ज : ९५४०

- नामंजूर अर्ज : ५७.८६२