शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Kolhapur Flood: पूरग्रस्त म्हणून किती दिवस जगायचे?, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बाधितांचा प्रश्न  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 3:43 PM

चित्रदुर्ग मठातील स्थलांतरितांना भेट

कोल्हापूर : साहेब आम्ही पूरग्रस्त म्हणून किती दिवस जगायचे, आमच्याकडे कधी लक्ष देणार? आम्हाचे पुनर्वसन कधी होणार? असे प्रश्न सुतारवाड्यातील पूरबाधित महिलांनी शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी पूर आल्यानंतरच तुम्ही आम्हाला विचारता? इतरवेळी पाठपुरावा करा, वारंवार विचारणा करा, असे उत्तर देऊन निघून गेले.पालकमंत्री मुश्रीफ यांनी चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित पूरग्रस्तांची भेट घेऊन जाताना सुतारवाड्यातील महिलांना अशी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ यांनी शहरातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. चित्रदुर्ग मठातील स्थलांरित पूरग्रस्तांची पाहणी केली. यावेळी प्रशासन के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांची माहिती घेतली.यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, काल रात्री खूप पाऊस झाला. ज्या-ज्या वेळी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. खूप पाऊस पडतो. यावेळीही अशीच स्थिती निर्माण झाली. जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर आला; पण मी आज पांडुरंगाला साकडे घातले आहे. सगळे व्यवस्थित होईल. पुण्याची पुराची घटना वेगळी आणि कोल्हापूरची घटना वेगळी आहे. आमच्यात जरूर मतभेद आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्यात चांगला समन्वय आहे. परिणामी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कर्नाटकातील आलमट्टीतून अधिकाधिक विसर्ग होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिप्परगी धरणातूनही विसर्ग वाढवण्याच्या सूचना दिल्या जातील. येथून एका अधिकाऱ्यास तिकडे पाठवून विसर्गाची नेमकी माहिती घेऊ.

महायुतीचे सरकार येईल..पाच वर्षे कोणालाही थांबायची इच्छा नाही. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी दोन, शिवसेना दोनसह आठ पक्ष आहेत. त्यामुळे इच्छुक वाढले आहेत. विधानसभेला बहुरंगी लढत होईल. यामधून महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरHasan Mushrifहसन मुश्रीफ