शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

गणित नसेल तर अभियांत्रिकीचे शिक्षण कसे घ्यायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. मात्र, ऑल ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. मात्र, ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने या तिन्ही विषयांत उर्तीण होण्याची अट रद्द केली आहे. मात्र, या बदलामुळे अभियांत्रिकीचा पायाच असणारे विषय जर वगळले तर अभियांत्रिकी(इंजिनिअरिंग) चे शिक्षण कसे घ्यायचे असा सवाल तज्ज्ञांनी केला आहे. तर विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अभियांत्रिकीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (पीसीएम) हे विषय घेऊन बारावी उर्तीण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकत होता. ज्यांना हे तिन्ही विषय जड जात होते. त्यांनाही अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. मात्र, गणित हा विषय या शाखेचा आत्मा आहे. हाच जर वगळला तर अभियांत्रिकीचे शिक्षण कसे घ्यायचे? असा सवाल अभियांत्रिकीमधील तज्ज्ञ अभ्यासकांना पडत आहे. हा निर्णय कलात्मक दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांकरीता घेतला आहे का असा सवालही तज्ज्ञ करीत आहेत. विशेष म्हणजे या बदललेल्या निर्णयानुसार अभ्यासक्रमाच्या एक दोन बॅचेस झाल्यानंतरच त्याचा परिणाम जाणवणार आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र व गणित हा विषय महत्त्वाचा आहे. अभियांत्रिकीला पहिल्या वर्षी एम-१, एम-२, एम-३ हे गणिताचे व भौतिकशास्त्र हे विषय सक्तीचे आहेत. अकरावी बारावीला हे विषय नसतील तर अभियांत्रिकीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी उर्तीणच होऊ शकणार नाहीत.

भौतिकशास्त्र म्हणजे अभियांत्रिकी आहे. यातील प्रश्न सोडविण्यासाठी गणिताची गरज लागते. प्रायोगिक तत्त्वावर अशा पद्धतीने कुठे हा अभ्यासक्रम सुरू आहे. त्याची उदाहरणेही द्यावीत. ही अट रद्द करून केवळ ज्यांना हे विषय अवघड जात असतील त्यांनाही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येईल. जागा भरावयाची म्हणून हा निर्णय धोकादायक आहे. याबाबत एक दोन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर हा बदललेला अभ्यासक्रम उपयुक्त आहे की नाही हेही समजेल. या अभ्यासक्रमात दर्जाही महत्त्वाचा आहे तर विद्यार्थ्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. दहावीपर्यंत हे तिन्ही विषय होते. तेच पुढे अभ्यासक्रमात आहेत, असे म्हणणे आहे. त्यामुळे एकूणच या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

कोट

अभियांत्रिकीला पीसीएम ग्रुप महत्त्वाचा आहे. मात्र, एआयसीटीईने कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे, हे माहीत नाही. या अभ्यासक्रमाच्या एक दोन बॅचेस बाहेर पडणे आवश्यक आहे. दर्जाही महत्त्वाचा आहे.

- जयदीप बागी, संचालक, शिवाजी विद्यापीठ , तंत्रज्ञान विभाग

कोट

गणित हा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा पाया आहे. पहिल्या वर्षाला एमवन, एमटू, एमथ्री, फोर असे विषय आहेत. पायाच कच्चा असेल तर विद्यार्थी अनुर्तीण होतील. एअरफोर्स टेक्निकलला प्रवेश मिळू शकणार नाही.

- प्रा. अभिजीत पाटील ,

प्रतिक्रिया

गणिताऐवजी जीवशास्त्र घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येईल. अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

सिद्धार्थ पाटील, अभियांत्रिकी विद्यार्थी,

प्रतिक्रिया

दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात तिन्ही विषयांचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे एआयसीटीईने घेतलेला निर्णय निश्चितच चांगला आहे.

- राज पाटील, स्थापत्य अभियंता