शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

आयएएसला सारेच भुलले, तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 10:55 IST

Police Ratnagiri Kolhapur : रुबाबात वावरणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब अखेर रत्नागिरी पोलिसांनी उतरवला. अर्जुन श्यामराव सकपाळ असे त्याचे नाव आहे. त्याला रत्नागिरी पोलिसांनी ओणी (ता. राजापूर) येथून अटक केली.

ठळक मुद्देआयएएसला सारेच भुलले, तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश रत्नागिरीत त्याचा रुबाब उतरवला

तानाजी पोवारकोल्हापूर : जिल्हाधिकारी झाला म्हणून गावातून जल्लोषी मिरवणूकही काढली, त्यानंतर त्याची पतही उंचावली, गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे त्याने अनेकांना सांगितले. त्यामुळे त्याचा गावात राबताही कमी आला. वर्षातून अधूनमधून कधीतरी त्याचे या आलिशान मोटारीतून गावात दर्शन होऊ लागले. त्याचा उंचावलेला दर्जा पाहून कोल्हापुरातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलीचे गेल्याच वर्षी त्याच्याशी लग्न लावून दिले. अशा रुबाबात वावरणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब अखेर रत्नागिरीपोलिसांनी उतरवला. अर्जुन श्यामराव सकपाळ असे त्याचे नाव आहे. त्याला रत्नागिरीपोलिसांनी ओणी (ता. राजापूर) येथून अटक केली.महाराष्ट्र शासनाचे उपसचिवांच्या नावाने बनावट डिजिटल सहीचा वापर करून तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचा खोटा आदेश तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पत्रात त्याने आपलेच नाव घातले होते. त्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी पर्दाफाश करत त्याला गजाआड केले.कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उपवडे पैकी न्हाव्याचीवाडी हे अर्जुन सकपाळचे गाव आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची, घरही लहान, घरी दुभती जनावरे असे साधारण घरचे चित्र होते. अभ्यासात हुशार असून त्याचे शिक्षण बीपी.एड.पर्यंत झाले असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली; पण सात वर्षांपूर्वी त्याने शक्कल लढवली व आपण आयएएस परीक्षा पास झाल्याने जिल्हाधिकारी बनल्याचे सांगून गावातून जल्लोषी मिरवणूकही काढली. त्यानंतर त्याचा स्तर उंचावला. तो गावातून गायब झाला. त्यानंतर गुजरातमध्ये एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनल्याचे अनेकांना सांगितले. वर्षातून तीन-चार वेळा आलिशान मोटारीतून दिमाखात येत होता, काही तासांचा वावर दाखवून पुन्हा जात होता. त्याचे गावात मोजकेत मित्र होते.त्याच्या या रुबाबाला भुलून जिल्ह्यातील एक निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक बळी पडले, त्यांनाही त्याने आपण गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे भासवल्याचे समजते, त्यांच्या मुलीशी गेल्याच वर्षी त्याचा कोकणातील एका रिसॉर्टवर विवाह झाला आहे. त्याच रिसॉर्टवर रत्नागिरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.फुलेवाडी रिंग रोडवर आलिशन बंगलात्याची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याने फुलेवाडी रिंग रोडवर आलिशान बंगला गेल्याच वर्षी खरेदी केला आहे. गावाकडील दुभती जनावरे, शेती विकून त्याने भाऊ, आई-वडील यांना त्या बंगल्यात आणून ठेवले आहे.वारंवार फोन नंबर बदलण्याची सवयत्याचा गावाकडे मोजकाच मित्र परिवार आहे; पण मोठे बोलणे व अनेकांना तो जिल्हाधिकारी असल्याचेच सांगत असतो. काहींचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो आपला मोबाइल नंबर वारंवार बदलत असल्याचे त्याच्या गावातील काहींनी माहिती दिली.कोल्हापूर पोलिसांनाही चकवाकाही महिन्यांपूर्वी त्याने कोल्हापूर पोलिसांनाही आपण गुजरातमध्ये जिल्हाधिकारी आहोत, लवकरच रत्नागिरीत बदलून येतोय अशा भूलथापा मारून काही पोलिसांनाही चकवा दिल्याचे समजते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरी