शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

शुभेच्छा फलकावरून इचलकरंजीत तणाव

By admin | Published: June 23, 2015 12:58 AM

दोन्ही गटांकडून घोषणाबाजी : जवाहरनगर परिसरात काही काळ जमावबंदी

इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरातील मराठा चौकात लावलेल्या शुभेच्छा फलकावरून सोमवारी सायंकाळी दोन गटांत पुन्हा वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी जवाहरनगर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला. रात्री ती शिथिल करण्यात आली. याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रभर शहरात पोलीस गाड्या गस्त घालत होत्या.जवाहरनगर परिसरातील मराठा चौकालगत प्रार्थनास्थळ आहे. एका समाजाचा पवित्र महिना सुरू झाल्याने काही नागरिकांनी या महिन्याच्या शुभेच्छांचा फलक या चौकात उभारला. गुरुवारी रात्री तो अज्ञातांनी फाडला. यामुळे शुक्रवारी सकाळी एका समाजाच्या नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार बंदोबस्त नेमला होता. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाऱ्यामुळे हा फलक थोडा वाकल्याने पुन्हा गैरसमज निर्माण झाला. त्यातच विनापरवाना हा फलक लावल्याने तो काढून घ्यावा, अशी तक्रार नगरपालिकेकडे आली. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हा फलक काढण्यासाठी आले. तेथे नागरिक व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्यात परवाना घेऊन फलक लावण्याबाबत चर्चा सुरू झाली. यावेळी परिसरातील दोन्ही समाजाचे तरुण जमले. त्यांनी परस्परविरोधी घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव वाढला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंनी चर्चा व वादविवाद होऊन वाद निवळला. शिवसेनेचे मलकारी लवटे यांनी पोलिसांशी बोलणी झाली असून, विनापरवाना फलक लावला जाणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळात नव्याने शुभेच्छा फलक तयार करून पोलीस बंदोबस्तात उभारण्यात आला. त्यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली.फलक उभारण्याचे काम पुन्हा सुरू झाल्याचे समजताच गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकत्र जमू लागले. त्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून जमावाला पांगविले. यावेळी १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू केली. पोलिसांनी स्ट्रायकिंग फोर्ससह मोठा पोलीस बंदोबस्त ठावला आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक महंमद मकानदार, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, शिवाजी कणसे, सतीश पवार, डी. एल. सुरवसे यांच्यासह अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. (वार्ताहर)...तर वाद वाढला नसता !पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही बाजूच्या नागरिकांना समजावून सलोख्याने तोडगा काढला असता, तर वाद एवढा विकोपाला गेला नसता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.एक तासासाठी जमावबंदीदरम्यान, इचलकरंजीत केवळ एक तासासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आता तेथील परिस्थिती शांत आहे, असे रात्री उशिरा जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापुरात पत्रकारांना सांगितले.