शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

इचलकरंजीतील टोळ्या ‘मोका’टच!

By admin | Published: July 25, 2016 12:57 AM

शहरात दहशत : माळी टोळीप्रमाणे मुसक्या आवळण्याची गरज

अतुल आंबी ल्ल इचलकरंजी शहापूर, तारदाळ व खोतवाडी या ग्रामीण परिसरासह औद्योगिक वसाहतीत खंडणी, खून, अपहरण यासह गंभीर गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या अमोल माळीच्या टोळीवर इचलकरंजी पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. या कारवाईचे नागरिकांतून स्वागतच होत आहे. मात्र, शहरातील अवैध व्यवसायाच्या माध्यमातून आपली दहशत पसरविणाऱ्या टोळ्या अद्याप मोकाटच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमोल माळी याच्यासह आठजणांच्या टोळीवर शहापूर पोलिसांनी मोका (संघटित गुन्हेगारी) कायद्यांतर्गत कारवाई केली. गंभीर दहा गुन्ह्यांत सहभाग असल्याने मोकाअंतर्गत कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले. मात्र, अन्य गुन्हेगारांची परिस्थिती वेगळीच आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनीच कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक मोठ्या गुन्हेगारांनी प्रत्येक गुन्ह्यावेळी सहकारी बदलले आहेत. तर गंभीर गुन्ह्यांमध्ये काही वर्षांचे अंतर टाकले आहे. त्यामुळे असे गुन्हेगार मोका कायद्याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात. वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात देशातील अनेक राज्यांतून नागरिक याठिकाणी व्यवसायासाठी येऊन रहिवाशी झाले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांबरोबर अशा काही प्रवृत्तीही शहरात आल्या. त्यांनी स्थानिक गुंडांबरोबर हातमिळवणी करून आपले साम्राज्य निर्माण केले. अवैध व्यवसाय, त्यातून मिळणारा पैसा या माध्यमातून तरुणांना भुरळ घालून आपल्या जाळ्यात ओढले. कमी श्रमातून मिळणारा अधिक पैसा, भुरटा रूबाब या भूलभुलय्यात अडकून असे तरुण काहीही करायला तयार असतात. कायद्याचा व पोलिसांचा धाक कमी झाल्यानेच अशी गुन्हेगारी फोफावते. चिल्लर फाळकूटदादाही एखाद्या पोलिसाबरोबर सलगी करून रूबाबात फिरतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सरकार बदलते, मंत्री बदलतात, पोलिस अधिकारीही बदलतात. मात्र, शहरातील गुंड, गुन्हेगार तसेच राहतात. या गुन्हेगारांना गजाआड करून सर्वसामान्य जनतेला कोणाकडून न्याय मिळणार का? वर्षानुवर्षे आपले साम्राज्य प्रस्थापित करून उजळ माथ्याने मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न जनतेतून व्यक्त होत आहे. ‘मोका’ कायद्यातील तरतूद ‘मोका’ कायद्याच्या तरतुदीनुसार दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन सलग तीन वर्षांच्या कालावधीत पैसे मिळविण्याच्या उद्देशाने केलेले गंभीर गुन्हे दाखल झाल्यास मोका अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे शहरातील काही नामी गुन्हेगार याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात. अनेक गुन्हेगारांना नगरसेवकपदाची स्वप्ने ४इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने अनेक गुन्हेगारी जगतातील गुंडांना नगरसेवक बनण्याची स्वप्ने पडत आहेत. त्या पद्धतीने भागात ‘फिल्डिंग’ लावण्याचे कामही काहीजणांनी सुरू केले आहे. ४अवैध मार्गाने पैसे कमवायचे आणि राजकारणात येऊन ‘व्हाईट कॉलर’ बनून आपली प्रतिमा उजळ करण्याचा हा प्रयत्न आहे. यांना जनतेशिवाय आता रोखणार तरी कोण? शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रवृत्तींना मते देऊन नेता बनवू नका, असा संदेश देण्यास सुरुवात केली आहे. जनतेने डोळसपणे मतदान केल्यास अशा प्रवृत्ती ठेचल्या जातील.