शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:22 IST

विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू

कोल्हापूर : राज्यात आमचे सरकार असतानाही शासकीय समित्यांवर नियुक्त्या होत नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही प्रक्रिया पार पाडली नाहीतर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला. महायुतीतील तिन्ही पक्षांत समन्वय नाही, विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी काही सूचना असतील तर मांडा, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक बोलले. मंडलिक आपले बोलणे संपवत असताना, ‘महेशरावां’च्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्याची उघड चर्चा करू नका, मंत्री मुश्रीफ यांच्या कानात सांगा’, असा टोला लगावला.त्यानंतर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर महेश जाधव म्हणाले, सकाळीच रंकाळ्यावर एका वृत्तवाहिनीने चर्चेसाठी सर्वपक्षियांना बोलावले होते. महायुतीकडून आपण एकटाच होतो. शिंदेसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची खुर्ची मोकळी होती. मग, आपली कामे लोकांपर्यंत पोहोचणार कशी? विधानसभा निवडणुकीला आपण एकदिलाने सामोरे गेलो तर महाराष्ट्र जिंकू. शासकीय समित्यांवरील नियुक्त्याबाबत आता बोलणार नाही. विधानसभेनंतर नियुक्त्या केल्या नाही तर मंत्री मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असे सांगत असताना मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात असल्याने त्यांना सोडल्याचेही जाधव यांनी सांगितले.फडणवीस यांचे आश्वासन अन्..देवेंद्र फडणवीस २०१४ ला सत्तेवर आल्यानंतर शासकीय समित्यांबाबत कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, त्यांनी पाच वर्षांत न करता २०१९ नंतर करण्याचे आश्वासन दिले. ही पाच वर्षेही गेली, आता २०२४ चे आश्वासन दिल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMahesh Jadhavमहेश जाधव