शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

कोरोनामुळे कर्जदार गेले..अन् ६२ कोटींचे कर्ज थकले, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 6:52 PM

कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत.

समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे १०६१ जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे ६२ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज थकीत असल्याचे समोर आले आहे. घरातील कर्ता माणूसच गेल्याने ही थकबाकी राहिली असून आता हे कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत.राज्य शासनाने महिन्याभरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कर्जाची सद्यस्थिती याबाबतची माहिती मागवली होती. त्यानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कर्जाच्या माहितीचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये तीन प्रकारच्या कर्जाची माहिती घेण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी आणि सेवक पतसंस्था मालमत्ता तारण असलेले थकीत कर्जदार अशी तीन विभागात ही माहिती घेण्यात आली आहे.नागरी पतसंस्था आणि सेवक पतसंस्थांचे सभासद आणि कर्जदार असलेले या तीनही जिल्ह्यातील ६०८ जण मृत्यू पावले असून त्या सर्वांनी २७ कोटी ५५ लाख ८ हजार ३४९ रुपये कर्ज घेतले होते. त्यातील २० कोटी ४९ लाख ३७ हजार ९९७ रुपये थकीत आहेत. तीनही जिल्ह्यातील ४५ बँकांकडे मालमत्ता तारण असलेल्या २६५ कर्जदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांनी या बँकांकडून ३२ कोटी ९० लाख, ३० हजार ८५७ रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी २१ कोटी चार लाख ६९ हजार, ६८० रुपये थकीत आहेत.

केडीसीसी बँकेचे सर्व कर्ज थकीतकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८६ जणांना १ कोटी ५४ लाख कर्ज मंजूर केले, परंतु गेल्या दोन वर्षात हे कर्ज न फेडल्याने उलट व्याज वाढल्याने ही रक्कम आता १ कोटी ५६ लाखांवर गेली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कर्जाची स्थिती

बँकेचे नाव  मयत कर्जदार मंजूर कर्ज थकीत कर्ज 
कोल्हापूर जिल्हा बँक   ८६    १,५४,१६,४१५    १,५५,७४.१६७
सांगली जिल्हा बँक    ३७२   १०,०८,४३,०५०  ८,५४,५०,२७१
सातारा जिल्हा बँक     ९३०   १५,२९,२८,०७९    १०,८२,०३,१०८
एकूण १३८८      २६,९१,८७,५४४     २०,९२,२७,५४६

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकcorona virusकोरोना वायरस बातम्या