शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सध्याच्या राज्यकर्त्यांकडूनच हिंसेच्या प्रेरणा, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:08 IST

पूर्वी गुंड दहशत करायचे, पण आता सरकारनेच पोसलेले राजकारणी अल्पसंख्याक विरोध, दहशत पेरण्याचे काम पद्धतशीर करत आहेत.

कोल्हापूर : सध्याच्या राज्यकर्त्याकडूनच हिसेंच्या प्रेरणा मिळत आहेत. सामाजिक तेढ, द्वेष, दंगली, सामूहिक हिंसा यामागचे राजकीय व्यूह समजून घेतले पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केले. शाहूंचे संस्कार नव्या पिढीवर व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी केले.येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सोमवारी आम्ही भारतीय लोकतर्फे राजर्षी शाहू सामाजिक सलोखा परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. जयसिंगराव पवार होते. शाहूंच्या विचारांची बीजपेरणी करून परिषदेचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गहू, चवळी, उडीद अशा समतेचे प्रतीक म्हणून बीजारोपणाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.अमोल पालेकर यांनी भाषण वाचून दाखविले. ते म्हणाले, हिंसेच्या प्रेरणा सध्याच्या राजकर्त्यांकडून मिळत आहेत. त्यांच्याकडून दहशतीचे सुरूंग पेरण्याचे काम होत आहे. प्रबोधनकारांच्या हत्या होतात पण मारेकरी सापडत नाहीत, यामागेही सरकारने पोसलेल्या राजकारण्यांचीच दहशत आहे. शाहूंच्या या भूमीतील गोविंद पानसरे तसेच दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासारख्या प्रबोधनकारांच्या मारेकऱ्यांना अजूनही शिक्षा झालेल्या नाहीत.पूर्वी गुंड दहशत करायचे, पण आता सरकारनेच पोसलेले राजकारणी अल्पसंख्याक विरोध, दहशत पेरण्याचे काम पद्धतशीर करत आहेत. चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून समाजमाध्यमांवरील सांस्कृतिक ट्रोल आर्मी प्रत्यक्षात रस्त्यावर येत आहेत. नेहरूंची प्रतिमा तोडूनच तुम्ही आज सावरकरांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. शाहू महाराज आज असते तर दंगल घडली नसती, असे पालेकर यांनी सांगितले.डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे हृदयाने संत हेते. इतरांप्रमाणेच मुस्लीम समाजालाही त्यांनी जवळ केल्याची अनेक दाखले आहेत. शंभर वर्षांपूर्वी शाहूंनी वुई दि पिपल असे म्हटले, त्याचेच प्रतिबिंब घटनाकारांनी संविधानात नंतर केले.उदय नारकर यांनी प्रास्तविक भाषणात २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ त्यांनी विद्वेषातून फोडला तरी आपण सलोख्याचा श्रीफळ वाढवून शाहू विचारांचा निर्धार करू या असे आवाहन केले. यावेळी सुभाष जाधव, दिलीप पवार, वसंत मुळीक, बाबुराव कदम, वसंतराव पाटील, डॉ. मेघा पानसरे, भारती पोवार, रफिक शेख, मुमताज हैदर व्यासपीठावर होते. यावेळी रिक्षा चालकाने पन्नास रुपये देउन सलोखा निधीस प्रारंभ केला. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. सतीशचंद्र कांबळे यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmol Palekarअमोल पालेकर