शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

युवकांच्या कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:18 AM

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगार युवा पिढीला आता कौशल्य दाखविले तरच नोकरी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कौशल्य विकासासाठी स्थिरावलेल्या ...

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगार युवा पिढीला आता कौशल्य दाखविले तरच नोकरी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कौशल्य विकासासाठी स्थिरावलेल्या युवकांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला पाहीजे, असे मत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी व्यक्त केले.

‘कर्तृत्व’ या संस्थेमार्फत अन्नदान चळवळीत सहाय केलेल्या तरुण मंडळे, संस्थांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य विराज सरनाईक होते.

जाधव म्हणाले, कोरोना काळात भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचविणे ही काळाची गरज होती. या कामाचे कौतुक करावे तितके थोडके आहे. पण आता युवा पिढीच्या हाताला काम देणे मोठे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे संस्थेने कौशल्य विकाससाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या वेळी अन्नदान चळवळीत सहाय साकोली सेना ग्रुप, राजे ग्रुप कसबा बावडा, खंडेलवाल ग्रुप, टिंबर मार्केटमधील अंबिका यात्री निवास ग्रुप, महाद्वार रोडवरील गण गण गणात बोते मंडळ, जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील नितीन पवार, सुनील आमते, प्रदीप पाटील व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, कौस्तुुभ कुलकर्णी, विनीत जिरगे, दिग्विजय निंबाळकर, प्रतीक हेगिष्टे, शर्वली सरनाईक, स्नेहा सरनाईक, धैर्यशील भोईटे आदी उपस्थित होते.

फोटो : १७०७२०२१-कोल-कर्तृत्व

आेळी : कोल्हापुरातील कर्तृत्व या संस्थेमार्फत कोरोनाकाळात राबविण्यात आलेल्या अन्नदान चळवळीत सहाय केलेल्यांचा पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, संस्थेचे विराज सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.