शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

हस्तक्षेपाशिवाय पूररेषा तयार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:27 AM

येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजनिअर्स या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन ...

येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजनिअर्स या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली शहरांसह शिरोळ तालुक्याची पूरस्थितीतील गंभीरता कमी आणण्यासाठी पंचगंगेचे पाणी भूमिगत पद्धतीने थेट राजापूर बंधाऱ्याखाली नेता येईल का यावर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीनही महापुरावेळी वेगवेगळी परिस्थिती होती. त्यामुळे त्यावर एकच उत्तर नाही. कोयना, वारणा धरण आणि कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रदेशात मोठा पाऊस झाला की सगळे पाणी कृष्णेत येते. राजापूर बंधाऱ्याच्या अलीकडे प्रचंड पाणी फुगवटा तयार होतो. त्याचा फटका सांगली, म्हैसाळ, राजापूरसह शिरोळ तालुका आणि कोल्हापूर शहरालाही बसतो. त्यामुळेच हे पाणी राजापूर बंधाऱ्याच्या खाली नेण्याचा विचार आहे. योजना खर्चिक आहे. परंतु, काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे.

बदलत्या परिस्थितीची मांडणी करताना पाटील म्हणाले, भान विसरून आम्ही कामाला लागलो. कुठेही गेले तरी गाडीच्या टायरला माती लागू नये यासाठी पेव्हिंग ब्लॉक घालत सुटलो. पाणी मुरण्याच्या जागा बंद केल्या. परिणामी नद्या, नाल्यांचे पाणी बाहेर पडू लागले. आता नव्याने पूररेषा करावी लागेल. ज्यामध्ये पूर्ण स्पष्टता असेल. फ्लॅट किंवा जागा घेताना येथे किती पाणी येऊ शकते याची माहिती आधीच ग्राहकाला मिळाली पाहिजे. ग्रामीण आणि शहरी नियमांमध्येही मोठा फरक असतो. त्यामुळे ग्रामपंचायती महानगरपालिकांमध्ये विलीन होण्यास तयार नसतात. शहराजवळच्या ग्रामपंचायतींबाबतच्या नियमांबाबतही फेरविचाराची गरज आहे. अत्यावश्यक ठिकाणी नदीला भिंत घालून आपण ठरावीक पातळीपर्यंत दक्षता घेेऊ शकतो.

चौकट

पाटील म्हणाले, यंदा धरणातून पाणी सोडण्याचे जे आम्ही नियोजन केले त्याला यश आले. त्यामुळे पुराची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. पालकमंत्री सतेज पाटीलही सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होते. वडनेरे समितीने जरी अलमट्टीचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी तेथील पाण्याचा विसर्ग वाढला की आपल्याकडील पाणी वेगाने खाली जाण्यास मदत होते हे मान्यच करायला हवे. म्हणूनच मी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली होती. याआधी कधीही याबाबत दोन्ही राज्यांचा इतका प्रभावी समन्वय नव्हता, असे कर्नाटकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आमच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी साडेतीन लाख क्युसेकपर्यंत पाणी सोडण्याची भूमिका घेतली.