शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

Kolhapur: करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला ३०९ वर्षे पूर्ण

By संदीप आडनाईक | Published: September 28, 2024 3:52 PM

संदीप आडनाईक कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन ...

संदीप आडनाईककोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली. तीन शतकांपूर्वी झालेल्या परकीय आक्रमण काळात मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी तत्कालीन श्रीपूजकांपैकी एकाने ही मूर्ती एका घरात लपवून ठेवली होती. नंतर करवीर संस्थानाची स्थापना झाल्यानंतर या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे हा दिवस कोल्हापूरसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशातून लाखो भाविक येत असतात. या मंदिराला मोठा इतिहास आहे. मंदिरात गाभाऱ्यात विराजमान झालेल्या श्री अंबाबाईचा मूर्तीचा इतिहासही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला गुरुवारी ३०९ वर्षे पूर्ण झाली, अशी माहिती मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली.आदिलशाहीत मोगलांनी मंदिरांचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वर मंदिरामागे राहणाऱ्या तत्कालीन श्रीपूजकांनी ती स्वतःच्या घरी लपवून ठेवली, तशी नोंद करवीर माहात्म्यात आहे. १७१० मध्ये करवीर संस्थानाची स्थापना झाली. त्यानंतर संभाजी महाराज दुसरे यांच्या कारकिर्दीत १७१५ ते १७२२ या कालखंडात या मंदिराचे पुनरुज्जीवन झाले.वेदशास्त्रसंपन्न नरहर भट प्रधान (सावगावकर) यांनी पन्हाळगडावर जाऊन संभाजी महाराज छत्रपतींना अंबाबाईच्या मूर्तीविषयी आणि त्यांना मिळालेल्या दृष्टांताची माहिती दिली. त्यांनी सिदोजीराजे गजेंद्रगडकर घोरपडे यांना आज्ञा दिल्यानंतर मन्मथ नाम संवत्सर इंदूवासर (सोमवार) विजयादशमी (दसरा) म्हणजे २६ सप्टेंबर १७१५ या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना केली.

सध्या नित्यपूजेमधील श्री अंबाबाई मूर्तीचे वर्णन सर जोशीराव यांच्या गारेचा गणपती मंदिरातील खांबावरील १२ व्या शतकातील शिलालेखात आहे. मूर्तीच्या हातात म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र असून, मूर्ती अडीच फुटांची आहे. मस्तकावर संयोनी लिंग आहे. कोल्हापूरच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. -उमाकांत राणिंगा, मूर्ती अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर