शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हा परिषदांच्या एकसष्टीचा शासनाला विसर

By समीर देशपांडे | Updated: August 19, 2022 17:58 IST

महाराष्ट्रामध्ये १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. त्यास १ मे २०२२ ला साठ वर्षे पूर्ण झाली.

समीर देशपांडेकोल्हापूर : नेतृत्व तयार करण्याचे विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना ६० वर्षे पूर्ण झाली. या पंचायत राजव्यवस्थेतील महत्त्वाच्या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची एकसष्टी सुरू होऊन साडेतीन महिने झाली तरी शासनाला याचा विसर पडला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.महाराष्ट्रामध्ये १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. त्यास १ मे २०२२ ला साठ वर्षे पूर्ण झाली. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेमध्ये १ मे रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेतला. सर्व जिल्हा परिषदांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली; परंतु त्यानंतर किमान प्रशासकीय पातळीवर तरी याबाबत काही नियोजन झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही.यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. राज्यसभा, विधान परिषद निवडणुका, गुवाहाटी दौऱ्यानंतर सत्ता स्थापना आणि ३३ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार यामध्ये बराच कालावधी गेला. गिरीश महाजन यांच्याकडे आता ग्रामविकास खाते देण्यात आले आहे. आता तरी या संस्थांच्या एकसष्टीच्या निमित्ताने ग्रामविकास विभाग नियोजन करेल अशी अपेक्षा आहे.

केवळ चारच महिने मिळणार

सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासक आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पदाधिकारी सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकसष्टीचे वर्ष केवळ चारच महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे आतापासूनच याची तयारी करण्याची गरज आहे.महाराष्ट्रातील पंचायत राज

  • पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २७ जून १९६० ला समितीची स्थापना.
  • या समितीने १५ मार्च १९६१ रोजी अहवाल सादर केला. २२६ पैकी मुख्य शिफारशी स्वीकारण्यात आल्या. त्याचा अधिनियम तयार करण्यात आला.
  • या अधिनियमाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर, १३ मार्च १९६२ रोजी तो राजपत्रामध्ये प्रकाशित.
  • जिल्हा परिषदांची प्रशासनिक यंत्रणा १ मे १९६२ पासून कार्यरत
  • २४ मे १९६२ ते ८ जून १९६२ या कालावधीत निवडणुका झाल्या.
  • पुढच्या दोन महिन्यांत पं. स. सभापती, जि. प. अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड. १५ ऑगस्ट १९६२ पासून लोकशाहीचे हे नवे अंग कार्यप्रवण.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती