शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

प्रतिसरकारच्या अमृतमहोत्सवाचा ‘जागर’; येडेमच्छिंद्र ग्रामस्थांचा निर्धार; ‘लोकमत’च्या लेखाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 1:10 AM

शिरटे : ‘सातारचे प्रतिसरकार...गळालेल्या पानातील स्वातंत्र्याची रत्ने’ या शीर्षकाखालील लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या क्रांतिसिंहांच्या गावाने पुढाकार घेत या स्वातंत्र्यलढ्याचा ‘जागर’ करण्याचा निर्धार केला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा लढा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची वास्तवता दोन लेखांद्वारे मांडण्यात आली होती. दोन्ही लेखांचे ...

शिरटे : ‘सातारचे प्रतिसरकार...गळालेल्या पानातील स्वातंत्र्याची रत्ने’ या शीर्षकाखालील लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या क्रांतिसिंहांच्या गावाने पुढाकार घेत या स्वातंत्र्यलढ्याचा ‘जागर’ करण्याचा निर्धार केला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा लढा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची वास्तवता दोन लेखांद्वारे मांडण्यात आली होती. दोन्ही लेखांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या अनुषंगाने क्रांतिसिंहांचे गाव असलेल्या येडेमच्छिंद्र येथे मंगळवारी (दि. २) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून पर्यायी यंत्रणा उभारून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते. प्रतिसरकारच्या स्थापनेस यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात क्रांतिसिंहांच्या अलौकिक कार्याचा विसर पडू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. क्रांतिसिंहांचे कार्य नव्या पिढीपुढे मांडण्यासाठी, त्यांच्या शौर्याचे स्मरण करून प्रेरणास्रोत म्हणून त्यांच्या स्मृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे.लेखातून मांंडल्या गेलेल्या या विषयावर उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजता ज्योतिर्लिंग मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रतिसरकारचा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करून नियोजन केले जाणार आहे.लेखाच्या प्रतींचे वाटप‘जागर’ या सदरामधून सलग दोन रविवारी प्रसिद्ध केलेल्या लेखाच्या पाचशे छायांकीत प्रती येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव पाटील व हौसेराव पाटील यांनी घरोघरी वाटल्या. ग्रामस्थांमधून यामुळे जागृती निर्माण झाली. त्यामुळे बैठकीबाबतचे नियोजन करण्यात आले.प्रतिसरकार हे तत्कालीन सातारा जिल्ह्यात स्थापन झाले होते. शासनाने हे लक्षात घेऊन सातारा येथे क्रांतिसिंहांचे भव्य दिव्य स्मारक उभारणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात मांडलेल्या प्रतिसरकारचे सर्व शिलेदार व नानकसिंग यांच्याविषयीची माहिती नवयुवकांना प्रेरणा देणारी आहे.- आनंद पाटील, शिक्षक, महादेववाडी (ता. वाळवा)