शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Kolhapur: पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 12:53 IST

उत्कर्षा पोतदार  उत्तूर : स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेजबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या ...

उत्कर्षा पोतदार उत्तूर : स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेजबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ प्रकल्प ता. आजरा येथे प्रकल्पग्रस्त न्याय मागण्यासाठी जलसमाधी घेण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना  अडवले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. गेली २५ वर्षे हे आंदोलन चालू आहे. या प्रकल्पात ८२२ प्रकल्पग्रस्त आहेत.त्यातील ३५५ शेतकऱ्यांनी धरण बांधण्यासाठी सहकार्य करून स्वेच्छेने जमिनी दिल्या. त्यांना लाख ते दीड लाख रुपये  नुकसान भरपाई दिली व ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला त्यांना हेक्टरी ३५ लाख रुपये भरपाई मिळाली आहे. वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणूनच प्रशासनाच्या या कार्यवाहीच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त आले होते. आंबेओहळ धरणस्थळावर आजरा तहसीलदार समीर माने,  सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने, दिनेश खट्टे,  कार्यकारी अभियंता शिल्पा राजे मगदूम, पाटबंधारे उप विभागीय अधिकारी आदिनाथ फडतरे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय धोंडपोटे व  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तसेच आपत्ती व्यवस्थापन फायर व्यवस्थापन व आरोग्य पथकाला तयारीत ठेवण्यात आले होते. वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, पी एस खरात उपस्थित होते.यावेळी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय येजरे, शंकर पावले, पांडुरंग पाटील, ज्योतिबा गुरव, अंबाजी पाटील, नामदेव पाटील, अजित बेलवेकर, समीर भोई, रमेश जाधव, राजेंद्र शिंदे, शिवराम देसाई व मोठ्या संख्येने शेतकरी महिला उपस्थित होत्या.आम्ही जगून तरी काय करायचं ?आम्ही जगून तरी काय करायचंय ? शेती धरणात गेली आहे. हृदयाचे ऑपरेशन झाल्यामुळे महिन्याला दोन हजार रुपयांची औषधे लागतात. आमच्याकडे पैसे नाहीत. पैसा कोठून आणायचा. - आनंदा विठोबा मेंगाणे धरणग्रस्त आरदाळबैठकीचे आश्वासन..अधिवेशन संपल्यानंतर पुण्याला जाऊन प्रस्ताव घेऊन मुंबईमध्ये पुनर्वसन मंत्री व कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करू असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलनHasan Mushrifहसन मुश्रीफguardian ministerपालक मंत्री