शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

शासनाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:28 AM

कुरुंदवाड : नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना शासनाने अत्यंत तोकडे अनुदान जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांची एकप्रकारे चेष्टाच केली आहे. जिल्ह्याला बसलेला महापुराचा ...

कुरुंदवाड : नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना शासनाने अत्यंत तोकडे अनुदान जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांची एकप्रकारे चेष्टाच केली आहे. जिल्ह्याला बसलेला महापुराचा फटका हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे महापुराचे संकट निर्माण झाले असून याची शिक्षा मात्र शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकरीविरोधी सरकार असून शेतकऱ्यांची ताकद दाखवून न्याय मिळविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

बस्तवाड (ता. शिरोळ) येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नाणीज संस्थेच्यावतीने पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या वाटपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेट्टी बोलत होते.

शेट्टी म्हणाले, ऊस पीक नुकसानीपोटी गुंठ्याला १३५ रुपये तर खरीप पिकाला केवळ ६८ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाच्या रकमेतून शेतातील कुजलेले पीकही शेतकरी काढू शकत नाही. नुकसानग्रस्त पूरग्रस्तांचे पीक कर्ज माफ व्हावे, प्रामाणिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने यापूर्वी जाहीर केलेली पन्नास हजारांची अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी या प्रमुख मागणीसाठी आमचा लढा सुरुच राहणार आहे. पूरग्रस्त कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. मात्र, जगद्गुरू नरेंद्राचार्य मठ संस्थांनने पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या रुपातून केलेली मदत पूरग्रस्त कधीही विसरणार नाहीत. माजी आमदार उल्हास पाटील, सावकर मादनाईक, सादिक बागवान, अभिजीत अवसरे, मनोहर गुंड, प्रशांत डांगरे, दिलीप कोळी, सुजाता भुरके उपस्थित होते.

फोटो - १६०८२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - बस्तवाड (ता. शिरोळ) येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नाणीज यांच्यावतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.