शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

कोल्हापूरच्या तिघा खेळाडूंची राज्य क्रिकेट संघात वर्णी

By सचिन भोसले | Updated: January 6, 2024 17:47 IST

कोल्हापूर : तेवीस वर्षाखालील सी.के.नायडू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे, श्रेयस चव्हाण, अभिषेक निषाद या तिघांची महाराष्ट्र राज्य ...

कोल्हापूर : तेवीस वर्षाखालील सी.के.नायडू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे, श्रेयस चव्हाण, अभिषेक निषाद या तिघांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. तिघेही कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत.ही स्पर्धा ७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या राज्यात खेळविली जाणार आहे. यात महाराष्ट्रासह सौराष्ट्र, पंजाब, झारखंड, आसाम, ओडीसा, छत्तीसगड, त्रिपुरा या आठ संघाचा समावेश आहे. महाराष्ट्राची पहिली लढत पंजाबशी आज, रविवारपासून मोहालीत होणार आहे. तर दुसरा सामना १४ जानेवारीला राजकोट येथे सौराष्ट्रशी, तर तिसरा समाना २१ जानेवारीपासून आसाम बरोबर गहूंजे (पुणे) येथे होणार आहे. चौथा सामना धनबाद येथे झारखंडसोबत होणार आहे. पाचवा सामना ओडीसासोबत छत्रपती संभाजीनगर येथे आणि सहवा सामना त्रिपूराबरोबर छत्रपती संभाजीनगर, सातवा सामना छत्तीसगड सोबत १८ फेब्रुवारीस छत्तासीगड येथे होणार आहे. या सामन्यांमध्ये हे तिघेही राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

अनिकेतने यापुर्वी २०१४ पासून वेगवेगळ्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने कूचबिहार, पश्चिम विभाग२५वर्षाखालील सी.के.नायडू स्पर्धेत राज्याचा उपकर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. तर अभिषेकने २०१७-१८ मध्ये चौदावर्षाखालील महाराष्ट्र संघात, त्यानंतर २०२० मध्ये कुचबिहार मध्ये चांगली कामगिरी केले. याच जोरावर त्याची राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी (राष्ट्रीय शिबीर) साठी निवड झाली. तो निवड झालेला पहिलाच कोल्हापूरकर होता. एकोणीस वर्षाखालील विनू मंकड स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती. 

श्रेयस चव्हाण याने २०१९ मध्ये १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. याच वर्षी विनू मंकड स्पर्धेसाठी निवड झाली होती. २०२२-२३ मध्ये २३ वर्षाखालील एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची राज्य संघात निवड झाली होती. या निवडी गंहूजे येथे झालेल्या १५ दिवसीय शिबीरातून करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर