शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कोल्हापूर हद्दवाढ: दोन्ही बाजूंचे एकमत करूनच तोडगा काढू - राजेश क्षीरसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 3:47 PM

विरोधाला विरोध करून कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकत नाही.

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे म्हणूनच दोन्ही बाजूंचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी प्रस्तावित गावांमधील सर्वपक्षीय कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले. क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महापालिकांची हद्दवाढ झाल्याने शहराशेजारील गावांचा विकास होऊन मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना प्राप्त झाल्या आहेत. परंतु, कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीसाठी गावांचा विरोध होत असल्यास त्यांची भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे.विरोधाला विरोध करून कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकत नाही. दोन्ही समिती प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत प्रयत्नशील आहे. गावांच्या विकासाचा आराखडा तयार करून दोन्ही बाजूंचे एकमत करून हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सकारात्मक तोडगा काढू.यावेळी हद्दवाढ विरोधी समितीचे राजू माने म्हणाले, हद्दवाढीस समितीचा विरोध नाही. पण, प्रस्तावित गावांतील लोकांची भूमिका समजून घेतली जात नाही. अनेक गावांनी ‘गाव बंद’ आंदोलन सुरू केले आहे.यावर बोलताना क्षीरसागर यांनी, ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सुटणार आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही बाब चुकीची आहे. विचारांची देवाणघेवाण करून दोन्ही समित्यांची संयुक्तिक बैठक होणे गरजे आहे. हद्दवाढ झाल्यास आवश्यक निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता दोन्ही समित्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी.यावेळी किशोर घाटगे, मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, पीयूष चव्हाण, रूपेश इंगवले, हद्दवाढ विरोधी गावांमधील कृती समितीचे बबन शिंदे, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळुंखे, सुधाकर म्हात्रे, शशिकांत पाटील, गजानन संकपाळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर