शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

कोल्हापूर हद्दवाढ : आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 11:43 AM

दोन मंत्री असूनही कोल्हापुरात आयटी पार्क झाला नाही. येथील बेरोजगारांना नोकरीसाठी पुण्यात जावे लागते. यामुळे आधी आयटी पार्क विकसित करा, मग हद्दवाढीचा विचार करू

कळंबा : हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांतील परस्पर विरोधी विचार, आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला, अशी सरपंचाची भूमिका, हद्दवाढ विरोधातील घोषणा आणि फलकबाजी अशा गोंधळाच्या वातावरणात रविवारी हद्दवाढ कृती समितीतर्फे शहरालगत असलेल्या कळंबा येथे आयोजित समन्वय बैठक पार पडली. यावेळी कृती समितीतर्फे हद्दवाढ फायद्याचीच आहे, असे सांगितले. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांचा हद्दवाढीला तीव्र विरोध केल्याने संवादाऐवजी विसंवाद वाढला. शेवटी बैठक गुंडाळली.

बैठकीत कृती समितीचे निमंत्रक ॲड. बाबा इंदूलकर यांचे भाषण सुरू असताना माजी सरपंच विश्वास गुरव यांनी हद्दवाढ विरोधातील मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन मंत्री असूनही कोल्हापुरात आयटी पार्क झाला नाही. येथील बेरोजगारांना नोकरीसाठी पुण्यात जावे लागते. यामुळे आधी आयटी पार्क विकसित करा, मग हद्दवाढीचा विचार करू असे गुरव यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी हस्तक्षेप करीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले.पण गुरव आक्रमकपणे आपली भूमिका मांडत राहिले. त्यावेळी इंदूूलकर, आर. के. पोवार यांनी सरपंच बोलल्यानंतर तुम्ही बोला, मध्येच बोलू नका, असे सूचित केले. तरीही गुरव ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे, संग्राम चौगुले आदींनी त्यांना बैठकीतून बाहेर घेऊन गेले.

माजी नगरसेवक अनिल कदम बैठकीत शांतता राखण्याचे आवाहन करीत होते. यामध्येच सरपंच भोगम यांनी हद्दवाढीच्या विरोधात भाषण केले. ते हद्दवाढ विरोधातील ग्रामसभेचे सर्व ठराव पोवार यांना देण्यासाठी गेले. पण पोवार यांनी ते ठराव न घेता जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा सल्ला दिला. पोवार यांनी ठराव न घेतल्याने सरपंच भोगम, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आक्रमक झाले. ते बैठकीतून बाहेर पडत हद्दवाढ विरोधी घोषणा दिल्या. बैठकच गुंडाळल्याने हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारीही निघून गेले.बैठकीस हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी माजी महापौर सुनील कदम, बाबा पार्टे, माजी नगरसेवक महेश उत्तुरे, विजय जाधव, सुभाष देसाई, कुलदीप गायकवाड, शुभांगी साखरे, अलका सणगर, किशोर घाटगे, उपसरपंच अरुण टोपकर, माजी पंचायत समिती सदस्य रंगराव तिवले, बाजीराव पोवार, राजू तिवले, सर्जेराव साळुंखे, दिलीप पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पेढा गोड झालाच नाही

पोवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला सरपंच भोगम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत पेढा भरवला. बैठकीतून गोड निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केल; पण बैठकीत गोंधळ झाल्याने पेढा गोड झालाच नाही.

महापालिकेच्या सेवा, सुविधा घ्यायच्या आणि हद्दवाढीला विरोध करायचे हे चुकीचे धोरण आहे. शहर आणि लगतच्या गावांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. गावांनी हद्दवाढीत समाविष्ट व्हावे. - आर. के. पोवार, हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक 

हद्दवाढ न झाल्याने शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. हद्दवाढ झाल्यास ग्रामीण भागांचाही समतोल विकास होणार आहे. विरोधाला विरोध न करता ग्रामस्थांनी हद्दवाढीचे फायदे समजून घ्यावेत. बैठकीत काही ग्रामस्थांचा विरोध झाला तरी सकारात्मक चर्चा झाली. - ॲड. बाबा इंदूलकर, कॉमन मॅनशहराच्या उपनगरांचा विकास झालेला नाही. याउलट कळंबा गावास विविध योजनेतून निधी मिळत आहे. त्यातून विकास केला जात आहे. म्हणून हद्दवाढीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. -सागर भोगम, सरपंच, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूर