शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
4
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
5
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
6
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
7
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
8
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
9
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
10
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
11
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
12
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
13
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
14
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
15
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
16
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
17
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
18
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
19
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
20
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता

कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:55 AM

एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.

ठळक मुद्दे अनेक कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम देताना घाम फुटण्याची चिन्हे साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी ६८० लाख टन गाळप, ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

विश्वास पाटील 

कोल्हापूर : एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.राज्यातील यंदाचा हंगाम तीस टक्के संपला आहे. यंदा सरकारने ६३० लाख गाळप टनाचा अंदाज केला होता; परंतु नोव्हेंबरपर्यंत लांबलेला परतीच्या पावसामुळे यंदा किमान ५० लाख टन गाळप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यत: सोलापूर जिल्ह्यात व मराठवाड्यात हे गाळप वाढणार आहे. नव्या अंदाजानुसार ६८० लाख टन गाळप व ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.भविष्यात साखरेचे दर चांगले राहतील असे गृहीत धरून कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे; परंतु साखरेचे दर ३ हजारांवर आल्यावर तेवढीच पहिली उचल देताना कारखान्यांची दमछाकच होणार आहे. इतर बिले थांबवून कारखाने तूर्त काहीतरी व्यवस्था करू शकतील परंतु दर घसरला तर राज्य बँकेकडून मिळणारी उचल कमी होणार असून कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

 

बाजारातील साखरेचे दर वाढू नयेत याची काळजी घेण्याऱ्या केंद्र सरकारने कारखान्यांना किमान ३५०० रुपये क्विंटल दर मिळायला हवा याची दक्षता घेतली पाहिजे. यासाठी निर्यातीस प्रोत्साहन किंवा बफर साठा करून बाजारातील दर घसरू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.विजय औताडेसाखर उद्योगातील तज्ज्ञ

 

हंगामाचे असेही वैशिष्ट्ययंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २९ कारखाने वाढले आहेत. त्यामध्ये सहकारी १० व खासगी १९ वाढले. प्रतिदिन गाळपही १ लाख ५४ हजार टनांनी वाढले. अनेक कारखान्यांनी विस्तारीकरण केल्याचा हा परिणाम आहे. आतापर्यंत १ कोटी टनांचे गाळप जास्त झाले आहे. परतीच्या पावसामुळे टनेज वाढले परंतु उतारा मात्र पाँईट २ ने घसरला आहे.राज्यातील १८ डिसेंबरअखेरचे गाळपविभाग       हंगाम सुरू झालेले कारखाने      गाळप (लाख टन)      साखर उत्पादन (लाख टन)    उतारा टक्के(कंसातील आकडे खासगी कारखान्यांचे)

  1. कोल्हापूर            २६ (११)                                  ६७.२२                                ७.४६                              ११.११
  2. पुणे                     ३०(३०)                                  ११२.४०                              ११.२६                            १०.०३
  3. अहमदनगर        १५ (०९)                                 ३९.९५                                 ०३.७२                            ०९.३३
  4. औरंगाबाद           ११(०९)                                 २३.९१                                  ०१.९४                           ०८.१३
  5. नांदेड                  १४(१५)                                  ३५.३९                                  ०३.६८                           ०९.२४
  6. अमरावती           ०० (०२)                                 ०२.१७                                  ००.०२                           ०९.५०
  7. नागपूर               ०० (०४)                                 ०१.७१                                  ००.०१                           ०८.४२

एकूण                    १४७ (६१)                             २८२.७६                              २८.२९                         ०९.९१ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर