शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

कोल्हापूर : राजारामपुरीत गुन्हेगारी फोफावतेय, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 4:38 PM

कोल्हापूर येथील संवेदनशील असलेल्या राजारामपुरी परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचा वावर वाढत आहे. दिवसाढवळ्या नागरिकांची लूटमारी, वर्चस्ववादातून हाणामारी, तलवार, चाकूहल्ले, आदी घटनांनी येथील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. राजारामपुरी पोलिसांच्या हाताबाहेर गेलेल्या या गुन्हेगारीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच आवर घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्दे राजारामपुरीत गुन्हेगारी फोफावतेय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

कोल्हापूर : येथील संवेदनशील असलेल्या राजारामपुरी परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचा वावर वाढत आहे. दिवसाढवळ्या नागरिकांची लूटमारी, वर्चस्ववादातून हाणामारी, तलवार, चाकूहल्ले, आदी घटनांनी येथील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. राजारामपुरी पोलिसांच्या हाताबाहेर गेलेल्या या गुन्हेगारीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच आवर घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.टोळ्यांच्या वर्चस्ववादातून खून, खुनाचा प्रयत्न, तर पैशाच्या हव्यासापोठी शाळकरी मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण, खंडणी, चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटनांबरोबरच राजारामपुरीच्या परिसराला गँगवॉरच्या गुन्हेगारीनेही पोखरले आहे. छेडछाडीच्या घटनांनी तर कळस गाठल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बालगुन्हेगारांची समस्याही भयावह रीतीने डोके वर काढताना दिसत आहे. दुचाकीवरून भरधाव येऊन नागरिकांच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून ‘धूम’ स्टाइलने पलायन करण्याऱ्या चेन स्नॅचरना पकडण्याच्या नादात पोलीसच ‘घामाघूम’ झाले आहेत.

राजारामपुरी मेन रोडसह राजेंद्रनगर, जवाहरनगर, विक्रमनगर, सुभाषनगर, मातंग वसाहत, लक्ष्मी कॉलनी, आईचा पुतळा चौक, यादवनगर, दौलतनगर, आदी परिसरांत सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून हाणामारीच्या घटना घडतात.

घराबाहेर पडणारे नागरिक सुरक्षितपणे पुन्हा घरी जातीलच याची हमी या परिसरात नाही. येथील गुन्हेगारी राजारामपुरी पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे. या गुन्हेगारांना चांगलाच चाप बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर