शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
9
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
10
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
11
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
12
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
13
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
14
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
15
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
16
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
17
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
18
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
19
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
20
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

कोल्हापूर : नियम मोडणारी देवस्थान समिती बरखास्त करा, पुजारी हटाव संघर्ष समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:57 IST

कायदा धाब्यावर बसविणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची पगारी पुजारी कायद्यानुसार स्थापन झालेली  नवी समिती बरखास्त करण्यात यावी व लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनात समितीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देनियम मोडणारी देवस्थान समिती बरखास्त करापुजारी हटाव संघर्ष समिती, हक्कभंगाच्या कारवाईची मागणी

कोल्हापूर : कायदा धाब्यावर बसविणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची पगारी पुजारी कायद्यानुसार स्थापन झालेली  नवी समिती बरखास्त करण्यात यावी व लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनात समितीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.

शासनाने मंजूर केलेल्या पगारी पुजारी कायद्यानुसार नवी समिती स्थापन होऊन त्यांच्याकडे अंबाबाई मंदिराच्या सर्व अधिकारांचे हस्तांतरण होणे गरजेचे आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत पुजारी नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. यावेळी डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई व डॉ. जयश्री चव्हाण यांनी पगारी पुजारी नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले, महाराष्ट्र शासन विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी अधिकृत केलेले अध्यादेश व केलेले विनियम क्रमांक ३५ हा सन २०१८ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यानुसार विद्यमान पुजाऱ्यांचे आनुवंशिक हक्क, विशेषाधिकार नाहीसे करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात कोणताही बदल करायचा असेल, तर शासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. अन्यथा ही कृती बेकायदेशीर ठरून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर शासनाने कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी करणे; त्यासाठी कलम ३ च्या पोटकलम (९) अन्वये श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे देवस्थान समितीने मंदिराचे सर्वाधिकार हस्तांतरित करावयाचे आहेत.

मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी ‘कायद्यानुुसार पुजारी नेमण्याचे सर्व अधिकार देवस्थान व्यवस्थापन समितीस राहतील,’ असे जाहीर करून दिशाभूल केली आहे. देवस्थान समिती ही सर्वस्वी वेगळी आहे.

पुनर्गठित होणाऱ्या व्यवस्थेवर आपला हक्क सांगणे ही शासनाची, समाजाची आणि भक्तांची घोर फसवणूक आहे.शिवाय, नव्या कायद्याचा आधार घेऊन परंपरागत पुजाऱ्यांना पुन्हा नेमण्याचे कटकारस्थान शिजत आहे. या कायद्यानुसार श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापनातील सारे लोकसेवक आहेत, याचे भान ठेवावे. समितीतील शासकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालू नये. 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर