शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : गंभीर गुन्हे दाखल असलेले चार सराईत गुंड जिल्ह्यातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 4:53 PM

खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववाद, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघा गुंडांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांना नोटीस देऊन जिल्ह्यातून हद्दपार केले.

ठळक मुद्देगंभीर गुन्हे दाखल असलेले चार सराईत गुंड जिल्ह्यातून हद्दपारराजारामपुरी पोलिसांची सराईत गुंडांना नोटीस

कोल्हापूर : खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववाद, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघा गुंडांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांना नोटीस देऊन जिल्ह्यातून हद्दपार केले.

संशयित टोळीप्रमुख गौरव अशोक भालकर (वय २८, रा. सरनाईक मळा, सम्राटनगर), ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर), नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर), नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर) अशी त्यांची नावे आहेत.

ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर), नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर), नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर)

ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर)

अधिक माहिती अशी, आगामी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.

नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर)

शहरासह ग्रामीण भागात गावपातळीवर नागरिकांच्या बैठका घेऊन समाजप्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन दंगल घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यातील उपद्व्यापी सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.

नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर)

राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड गौरव भालकर व त्याच्या साथीदारांची दहशत आहे. खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये या संशयितांचा हात असल्याने त्यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दिला होता.

संशयितांचे रेकॉर्ड गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांनी दिले. त्यानुसार या चौघांना नोटीस देऋन जिल्हा सोडण्यास भाग पाडले. ज्या जिल्ह्यात ते वास्तव करतील तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही दिले आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा