शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Kolhapur: =पंचगंगेची पातळी ४९ फूटावर गेल्यास कोल्हापुरातून रेल्वे वाहतूक होणार बंद, प्रवासाला निघण्यापूर्वी करा चौकशी

By संदीप आडनाईक | Published: July 27, 2024 9:07 PM

Kolhapur News: पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा.

- संदीप आडनाईक

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील पूलाव ४८ फूट पाणी आले आहे. पाण्याची पातळी जर ४९ फूटावर गेली तर कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वेची वाहतूक बंद होण्याची शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.

रेल्वेच्या पुणे विभागाने याबाबत इशारा दिला आहे. कोल्हापूर मार्गावरील कोल्हापूर मालधक्का ते रुकडी यादरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी या ठिकाणी पाण्याची पातळी ४८ फूट इतकी आहे. कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी पुलाजवळ वाढतच आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील. यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

महालक्ष्मी, कलबुर्गी सुटलीदरम्यान, शनिवारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कलबुर्गी एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांनी प्रवासी घेउन प्रयाण केले आहे. या दोन गाडया रुकडी येथील पंचगंगा नदीवरील पूलावरुन पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. रात्री उशिरा पुण्याकडे धावणारी विशेष रेल्वेसह ४.३० वाजता कोल्हापुरात येणारी हरिप्रिया एक्सप्रेस येणार की नाही हे समजल्यानंतरच इतर सर्व रेल्वे सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. जर पाणीपातळी वाढली तर पुढील आठवड्यात रेल्वेसेवा बंद राहणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkolhapurकोल्हापूर