शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी, डागडुजीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:28 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी मंगळवारी कोल्हापूरची श्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी करून डागडुजीच्या तसेच मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी, डागडुजीच्या सूचना मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना

कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी मंगळवारी कोल्हापूरची श्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी करून डागडुजीच्या तसेच मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना केल्या.

मंदिरात पाणी साचून राहू नये यासाठी परिसरातील गटारी, चेंबर्सच्या स्वच्छतेसाठीही महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिरातील महाकाली मंदिरासमोर तसेच प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी गळती आहे.

जोराचा पाऊस झाला की देवस्थानच्या कार्यालयासमोर तळे साचते. बाह्य परिसरातूनही ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, अभियंता सुदेश देशपांडे यांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली.यावेळी त्यांनी शिखराच्या आजूबाजूस टेरेसवर पडलेल्या भेगा तत्काळ भरून घ्याव्यात, ओवऱ्यांवरील गळती बंद करावी, मंदिरामध्ये जमा होणाऱ्या  पाण्याचा निचरा होण्यासाठी परिसरातील गटारी, चेंबर तत्काळ स्वच्छ करून घ्यावीत व पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या.

बाह्य परिसरातही महापालिकेच्या हद्दीतील गटारी स्वच्छ करून घेण्याबाबत पत्रव्यवहार, मंदिरावर उगविलेली छोटी झुडपे काढणे, अनावश्यक वस्तू काढून टाकणे, संपूर्ण मंदिरामध्ये पावसामुळे कोठेही शेवाळ होऊन भाविक पडणार नाहीत किंवा कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या.

मातुलिंग मंदिरातील दगडी भिंतीवरील रंग काढून त्याचे मूळ स्वरूप खुलविणे, महाद्वार दरवाजावरील निसटलेले दगड तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थित करण्याबाबतही सूचना केल्या.सचिवांचे दुर्लक्ष... समितीची नाराजीसुट्या आणि अधिक महिना यांमुळे गेले महिनाभर अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. भाविकांच्या रांगाच्या रांगा भवानी मंडपापर्यंत जात असून अंतर्गत भागात गर्दीमुळे गुदमरल्यासारखे होते, एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी समितीचे पदाधिकारी धडपडत असले तरी सचिवांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याची पहिली जबाबदारी सचिवांची असताना ते फिरकलेही नाहीत, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.

 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर