शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Kolhapur North Assembly constituency: पन्नास वर्षांत मालोजीराजेंचे रेकॉर्ड कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 11:20 AM

काँग्रेसचे उमेदवार मालोजीराजे यांना २००४ च्या निवडणुकीत ७६१५७ मते पडली होती. ते २८१४२ मतांनी विजयी झाले होते. मागील अकरा निवडणुकांत हे सर्वाधिक मतांचे व मताधिक्याचेही रेकॉर्ड आजही कायम आहे.

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हा कुण्या एका पक्षाचा नव्हे, तर विरोधी विचारांचा बालेकिल्ला असल्याचेच मागील अकरा विधानसभा निवडणूक निकालांवर नजर टाकल्यास ठळकपणे दिसते. या अकरा निवडणुकांत काँग्रेसचा तीन वेळा, शेकापचा दोनवेळा व जनता दलाचा एकदा असा डाव्या-पुरोगामी विचारांचा सहा वेळा विजय झाला आहे. शिवसेना पाचवेळा जिंकली आहे.

काँग्रेसचे उमेदवार मालोजीराजे यांना २००४ च्या निवडणुकीत ७६१५७ मते पडली होती. ते २८१४२ मतांनी विजयी झाले होते. मागील अकरा निवडणुकांत हे सर्वाधिक मतांचे व मताधिक्याचेही रेकॉर्ड आजही कायम आहे.

कोल्हापूरच्या राजकारणात वारे फिरवण्याची ताकद आहे. त्याचे प्रत्यंतर अनेक वेळा आले आहे. त्यामुळे देशात कोणती लाट आहे, त्याचे पडसाद कोल्हापूरच्या राजकारणावर पडतीलच असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड लाट होती; परंतु तरीही त्या निवडणुकीत कोल्हापूरने राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी केले. त्याच वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीतही कोल्हापूरने शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना गुलाल दिला.

आतापर्यंतच्या सर्व लढतींत फक्त २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतच शिवसेना-भाजपला दोन्ही काँग्रेससह पुरोगामी पक्षांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. हे शहर कधीकाळी शेका पक्षाचा बालेकिल्ला होता. नंतर डाव्या-पुरोगामी विचारांमध्ये दुफळी होत गेली तशी शिवसेनेचे वर्चस्व वाढल्याचे चित्र दिसते. कोल्हापूर कुणाला विजयी करायचे यापेक्षा कुणाला पराभूत करायचे याचा निर्णय अगोदर घेत असल्याचे अनेकदा प्रत्यंतर आले आहे.

गेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांचा विजयही त्याच लाटेतून झाला. कोल्हापूर शहर मतदार संघात काँग्रेसने पहिल्या निवडणुकीपासून लक्षणीय मते घेतली आहेत. परंतु या पक्षाने या मतदार संघाची कधीच मनापासून बांधणी केलेली नाही. पक्षाचे सर्व प्रभागांत नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. मालोजीराजे २००४ ला पहिल्याच लढतीत मोठ्या मतांनी विजयी झाले; परंतु पाच वर्षांत लोकांना त्यांचा जो अनुभव आला, तोच त्यांच्या २००९ च्या पराभवास कारणीभूत झाला. त्याबद्दलची जाणीव त्यांना १३ वर्षांनी गेल्या आठवड्यात झाली.

पक्षीय कुरघोडीचे राजकारण, संघटना बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि प्रत्येक वेळी नवखा उमेदवार हीच काँग्रेसची या मतदार संघातील पराभवाची कारणे आहेत. काँग्रेसचा विचार मानणारा मतदार चांगल्या संख्येने कोल्हापूर शहरातही आहे, त्याचा सांभाळ करण्याचे काम या पक्षाला जमलेले नाही हे मात्र खरे.

महिला आमदार नाहीकोल्हापूरने अनेक चांगले पायंडे राज्याला व देशाला घालून दिले; परंतु या शहराने आजपर्यंत महिलेला आमदार केलेले नाही. अनेक महिलांनी या शहराचे महापौरपद भूषविले, काँग्रेसनेच यापूर्वी १९९५ ला शिवानी दिलीप देसाई यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांनाही विजयी होता आले नाही. कोणत्याच पक्षाने सक्षम उमेदवार म्हणून महिलांचा विचार केलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र आतापर्यंत विमलाबाई बागल, सरोजिनी खंजिरे, संजीवनी गायकवाड, संध्यादेवी कुपेकर यांनी विधानसभेत तर निवेदिता माने यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.

कोण किती साली जिंकले

  • १९७२ : त्र्यं. सी. कारखानीस(शेकाप)
  • १९७८ : रवींद्र सबनीस (जनता पक्ष)
  • १९८० : लालासाहेब यादव (काँग्रेस)
  • १९८५ : प्रा. एन. डी. पाटील (शेकाप)
  • १९९० : दिलीप देसाई (शिवसेना)
  • १९९५ : सुरेश साळोखे (शिवसेना)
  • १९९९ : सुरेश साळोखे (शिवसेना)
  • २००४ : मालोजीराजे छत्रपती (काँग्रेस)
  • २००९ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
  • २०१४ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
  • २०१९ : चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस