शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूर : प्रत्येकाच्या घरी ‘खादी’ पोहोचली पाहिजे : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:38 IST

सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे

ठळक मुद्देखादी भांडार नूतनीकरण समारंभ; ४० चरख्यांची मागणीत्याचा प्रस्ताव मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.

कोल्हापूर : सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे मंगळवारी महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चरखापूजन व खादी भांडार नूतनीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

खासदार महाडिक म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा महामंत्र दिला. चरख्यावर खादी कपडे निर्मिती करण्याच्या कलेचा प्रचार केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर खादीनिर्मिती हे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. काळाच्या ओघात खादी व ग्रामोद्योगाला उतरती कळा लागली. यावर अवलंबून असणारे लाखो लोक बेरोजगार झाले. काळाच्या ओघात खादीची विक्री कमी झाली आहे. खादीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाखादी’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात एक खादी गेली पाहिजे; तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या तत्त्वाचे आचरण होईल.

गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते झाल्यावर चरखापूजन झाले. यावेळी प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी खासदार महाडिक यांच्याकडे सौरऊर्जेवर चालणाºया चरख्यांची व एका मोबाईल व्हॅनची मागणी केली. यावर महाडिक यांनी त्याचा प्रस्ताव मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.

यावेळी महात्मा गांधी अध्यासनाच्या डॉ. भारती पाटील, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे प्राचार्य व्ही. डी. माने, प्रा. आशाताई कुकडे, दादासाहेब जगताप, प्रा. गीता गुरव, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अनुराधा भोसले, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, प्रा. सुधीर देसाई, राजेश घोरपडे, सविता देसाई, सचिव एस. एल. तुपद, प्रकाश चौगुले यांसह सर्वोदय कार्यकर्ते उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीkolhapurकोल्हापूर