शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

कोल्हापूर : शनिवारपासून हंगाम सुरू होणार, साखर कारखानदारांच्या पातळीवर हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:56 PM

पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह्यातील कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये हंगामाची चाचपणी करण्यात आली.

ठळक मुद्देशनिवारपासून हंगाम सुरू होणार, साखर कारखानदारांच्या पातळीवर हालचालीशेती अधिकाऱ्यांची झाली आढावा बैठक

कोल्हापूर : पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह्यातील कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये हंगामाची चाचपणी करण्यात आली.ऊसदराच्या प्रश्नांवरून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची कोंडी निर्माण झाली आहे. रविवारी कारखानदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन एफआरपी देण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्यावर ‘मदत करू पण हंगाम सुरू करा’, अशी सूचना मंत्री पाटील यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक कागलमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये कारखानानिहाय आढावा घेण्यात आला.

‘एफआरपी’ देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर त्यापेक्षाही मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे दिवाळीचे चार दिवस थांबूया, पण शनिवारपासून हंगाम सुरू करावाच लागेल, अशी भूमिका बहुतांशी अधिकाऱ्यांनी मांडली.

ऊसतोडणी मजुुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे हात थांबल्याने त्यांना खावटी कर्ज उपलब्ध करून द्यावे लागणार असल्याने तो पेच आहे. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न सुरू ठेवायचा पण कारखाने शनिवारपासून सुरू करावेत यावर एकमत झाल्याचे समजते.शुक्रवारी ‘भाऊबीज’ आहे, शनिवारी हंगाम सुरू करायचा म्हटले तरी मराठवाड्यातील ऊसतोड मजूर शनिवारचा मुहूर्त करत नसल्याचे अनेक कारखाना अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवारी दुपारीच तोडण्या देऊन शनिवारपासून हंगाम सुरू होऊ शकतो.

जिल्ह्यात १२० लाख टन ऊस उपलब्धकृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यातील उसाच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. यंदा १२० लाख टन ऊस उभा असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार का? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सूचित केल्याचे समजते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर