शहरं
Join us  
Trending Stories
1
अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात...
2
"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज
3
शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण
4
यवतमाळमध्ये भिंतीवर डोकं आपटून २१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना घेतले ताब्यात
5
Mohammad Shami: मोहम्मद शमीचा 'बंगाल क्रिकेट'कडून अपमान? १० महिन्यांनी बोलवून सत्कार, त्यातही केल्या दोन मोठ्या चुका
6
पुन्हा तेच! कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत...
7
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Video: शायनिंग मारायला गेला अन् तोंडावर पडला... पाकिस्तानी खेळाडूची भरमैदानात फजिती
9
वैभव चव्हाण बिग बॉस मराठीमधून बाहेर, अरबाजला अश्रू अनावर! ५० दिवसांचा प्रवास संपला
10
'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल
11
बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर
12
₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला!
13
मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा
14
“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत
15
'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!
17
"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला
18
“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”
19
“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
20
जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट

कोल्हापूर :  शांतता, सौहार्दासाठी मूल्यशिक्षणाची गरज : विलास नांदवडेकर; शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:22 PM

समाजामध्ये शांतता आणि सौहार्दाच्या प्रस्थापनेसाठी सार्वत्रिक स्तरावर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी येथे केले. महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि पाचगणीतील बहाई अकादमीतर्फे आयोजित केलेल्या मूल्यशिक्षणविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देमूल्याधिष्ठित शिक्षणातूनच मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेची निर्मिती शक्य : नांदवडेकर पाचगणीतील बहाई अकादमीतर्फे आयोजित मूल्यशिक्षणविषयक कार्यशाळेचे उद्घाटनमहाविद्यालयांतील शिक्षकांसाठी शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रतर्फे कार्यक्रम

कोल्हापूर : समाजामध्ये शांतता आणि सौहार्दाच्या प्रस्थापनेसाठी सार्वत्रिक स्तरावर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी येथे केले. 

महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि पाचगणीतील बहाई अकादमीतर्फे आयोजित केलेल्या मूल्यशिक्षणविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमास बहाई अकादमीचे डॉ. लेसन आझादी, शशी गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, महात्मा गांधी यांची मूल्यशिक्षणावर नितांत श्रद्धा होती. भारतीय समाजात मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी ते आग्रही होते. आज प्रत्येकजण कोणत्याही मूल्यांपेक्षा पैसा या मूल्याच्या अधिक पाठी लागल्याचे दिसत आहे; पण, अखेरीस जीवनात शांती हवी असेल, तर नैतिकता आणि मानवी मूल्यांचेच स्थान सर्वोच्च आहे. हे मूल्यशिक्षण एका दिवसात निर्माण होणारी बाब नाही. शिक्षणव्यवस्थेत प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रूजवात करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. मूल्याधिष्ठित शिक्षणातूनच मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेची निर्मिती करता येणे शक्य आहे.

केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव म्हणाले, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचे काम मूल्ये करतात. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मनुष्य विविध प्रकारच्या पर्यावरणातून वाटचाल करतो. हे सारे पर्यावरण त्याच्यातील मूल्यव्यवस्थेला आकार देण्याचे काम करते. या कार्यक्रमात डॉ. आझादी आणि डॉ. गायकवाड यांनी मूल्यशिक्षणाबाबत बहाई अकादमी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. डॉ. एस. डी. कोरे यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर