शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: प्रतिगामी शक्तींना कोल्हापूरकर विरोध करतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 12:54 PM

आता एक नेता उठला आणि भोंगे वाजवायचे बंद करा, म्हटल्यावर भाजपची मंडळी लगेच मागणी करू लागली. सत्तेत असताना पाच वर्षे काय झोपा काढल्या होत्या का?

कोल्हापूर : धर्मा-धर्मात फूट पाडणाऱ्या, जाती-जातीमध्ये भांडणे लावणाऱ्या, आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि दंगली पेटविणाऱ्या प्रतिगामी शक्तींच्या मागे माझे कोल्हापूरकर कधीच जाणार नाहीत, अशा शक्तीला विरोध करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राजारामपुरी येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी भर पावसात भाजपवर जोरदार हल्ला चढविला. अजित पवार म्हणाले, पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर आली. कोरोनाच्या संकटातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला खीळ बसू दिली नाही.कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावत असताना दुर्दैवाने चंद्रकांत जाधव आपल्यातून गेले. त्यांचे विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी जयश्री जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. राजेश क्षीरसागर यांना थांबावे लागले असले तरी, तो नेतृत्वाचा निर्णय होता. उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व बळकट करण्याबरोबरच त्यांच्या विचाराचा आमदार विधिमंडळात पाठविण्यासाठी जिवाचे रान करा. खोट्या प्रचाराला बळी पडू नका.

बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस महात्मा गांधी घरा-घरात पोहोचविणार अशी टीका चंद्रकांत पाटील करत आहेत. त्यांच्या बुध्दीची कीव येते. होय, आम्ही गांधीजींचे विचार घरा-घरात पोहोचवणार आहोत. आम्ही त्याच्याशी बांधील आहोत. तुम्ही गोडसेच्या विचाराचे बांधील असल्याने अशी भाषा येत आहे.

या मंडळींना सत्ता सोडवत नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करायची तयारी आहे. त्यामुळे या विचाराला कोल्हापूरची जनता कधीही थारा देणार नाही. चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना विजयी करा.

शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार करत आहे. महागाई वाढविण्याचा ठेका घेतलेल्या भाजपला कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत विसर्जित करा. मुंबई बँक लुटलेले लोक येथे येऊन हिंदुत्वाबाबत बोलत आहेत. जयश्री जाधव नव्हे, तर उध्दव ठाकरे हेच उमेदवार म्हणून मतदान करा.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, राजेश पाटील, वैभव नाईक, राजू आवळे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, जयश्री जाधव, अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, रोहित आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.

काश्मीर फाईलने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार का?

भाजपची मंडळी देशातील तरुणांना काश्मीर फाईल दाखवत आहेत. मात्र यामुळे गोरगरिबांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? या रस्त्यांना आपणाला जाऊन चालणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पाच वर्षे झोपा काढल्या का?

आता एक नेता उठला आणि भोंगे वाजवायचे बंद करा, म्हटल्यावर भाजपची मंडळी लगेच मागणी करू लागली. सत्तेत असताना पाच वर्षे काय झोपा काढल्या होत्या का? सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आहे. सगळे सण उत्साहाने साजरे करायचे, ही शाहू, फुले आंबेडकरांची शिकवण असल्याचे पवार यांनी सांगितले.

महाडिकांची भाषा बदलली

महिलांबद्दल अपशब्द वापरला जातो, विरोधकांची प्रचाराची पातळी घसरली आहे. आपण धनंजय महाडिक यांना जवळून ओळखतो. भाजपमध्ये गेल्यापासून त्यांची भाषा बदलल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

प्रा. जयंत पाटील यांना ‘ईडी’ लावा

जयंती नाल्यावर भराव टाकून इमारती उभ्या केल्याने कोल्हापूरकर महापुरात सापडले. त्यातून वाचविण्यासाठी परवापर्यंत नेत्यांच्या पाया पडणारे प्रा. जयंत पाटील यांच्यावरच ईडीची कारवाई केली, तर डोळे पांढरे होतील, अशी टीका भारती पाेवार यांनी केली.

(छाया - नसीर अत्तार)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेना