शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कोल्हापूर : बॅकफुटवर नाही पण अपेक्षा मात्र वाढल्या : पूनम महाजन यांची कबुली, शिवसेनेबरोबर युतीचे संकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 15:45 IST

केंद्र व राज्य सरकारबध्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाहता लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्यच परंतू सरकार किंवा पक्ष म्हणूनही आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेबरोबरचे भांडण हे घरातल्या भांडणासारखे आहे, आणि युती दोन्ही बाजूने तोडली गेलेली नाही असे सांगत त्यांनी या पक्षाशी नव्याने युतीचे संकेत दिले.

ठळक मुद्देबॅकफुटवर नाही पण अपेक्षा मात्र वाढल्या : पूनम महाजन यांची कबुलीशिवसेनेबरोबर युतीचे संकेत 

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारबध्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाहता लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्यच परंतू सरकार किंवा पक्ष म्हणूनही आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेबरोबरचे भांडण हे घरातल्या भांडणासारखे आहे, आणि युती दोन्ही बाजूने तोडली गेलेली नाही असे सांगत त्यांनी या पक्षाशी नव्याने युतीचे संकेत दिले.श्रीमती महाजन यांचा गुरुवारपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु झाला. त्यानिमित्त सकाळी येथे त्यांची जल्लोषात रॅली काढण्यात आली व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदीं पंतप्रधान म्हणून चांगले काम करत असले तरी त्यांच्याकडे चांगली टीम नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केले होते.

त्याबध्दल पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या,‘ पवार म्हणतात तसे कांही नाही. भाजप व सरकारमध्येही उत्तम टीमवर्क आहे.शिवाय आमचा कॅप्टनच इतकी धुवाँधार बॅटींग करत आहे. भारत जेव्हा मॅच जिंकतो तेव्हा विराटच्या खेळाचीच चर्चा होते. त्यामुळे पवार यांनी आमच्या टीमची काळजी करू नये. काँग्रेस आघाडीच्या काळात बरेचसे निर्णय रिमोट कँट्रोलने होत होते.’

त्या म्हणाल्या,‘ पक्ष मोठा व्हायला लागला की खटके उडतात तसेच शिवसेनेसोबत झाले आहे. परंतू तो पक्ष अजूनही सत्तेत आहे. व जरी शिवसेनेने स्वबळावर लढायची घोषणा केली असली तरी हा निर्णय एकाबाजूने झाला आहे. आमचा त्यांच्याशी संवाद सुरु आहे व मला वाटते त्यातून कांहीतरी मार्ग निघेल.

यावेळी आमदार योगेश टिळक, मधुकेश्र्वर देसाई, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, राहूल चिकोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा हेच माझे लक्ष्यमुंबईतून लोकसभा निवडणूक पुन्हा चांगल्या मतांनी कशी निवडून येवू हाच माझा तरी सध्याचा महत्वाचा प्राधान्यक्रम आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्हांला कितपत संधी या प्रश्र्नांवर त्यांनी छे..कांहीतरी काय प्रश्र्न विचारताय असे उत्तर दिले. 

टॅग्स :Poonam Mahajanपूनम महाजनkolhapurकोल्हापूर