शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"बिंदू चौकात सांगतो, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत"; सतेज पाटलांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 17:46 IST

या जिल्ह्यात महाडिकांनी दहशतीचं, गुंडगिरीचं राजकारण केले, २५ वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. कदाचित पहिल्यांदा ताकदीने त्यांच्याविरोधात खंबीरपणे कोण लढत असेल तर ती लढाई मीच लढतोय असं त्यांनी सांगितले.

कोल्हापूर - मी १०० टक्के म्हणतो, बिंदू चौकातून सांगेन, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत. जर भ्यायले नसते तर छाननीत अर्ज बाद करण्याचे कारण काय होते? बाळा तू लहान आहे. मी घरातून बाहेर पडलो नाही. मी पुण्यात होतो. घरात असतो तर काय झाले असते हे जिल्ह्याने पाहिले असते. मला मारायला आलेत होते का असा खुलासा अमोल महाडिकांनी केला पाहिजे अशा शब्दात सतेज पाटलांनी इशारा दिला आहे.  

जिल्ह्यात सध्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या प्रचारात सतेज पाटील म्हणाले की, २५ वर्षाच्या राजकारणात मी पहिल्यांदा बघतोय, ७०-८० टक्के कामगार सहकारी संस्थेत नाराजी व्यक्त करत आहेत. मी गोकुळची निवडणूक लढवताना सगळ्या मतदारांनी मला सहकार्य केले. आम्ही राजकारणात आहोत. एखाद्या गावात गेलो तर माणसं डोळ्यात डोळे घालून बोलतात तेव्हा ते आपल्यासोबत असतात. डोळा चुकवायला लागले तर समजायचं आपला कार्यक्रम करणार हा अनुभव आहे. माणूस नजर चुकवायला लागला तर काहीतरी गणित बिघडलंय हे ओळखायचं असं त्यांनी सांगितले. 

तर कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन करायचे, आता हे सभासदांनी ठरवले आहेत. वातावरणात बदल दिसायला लागलाय. त्यामुळे २८ अर्ज छाननीत उडवण्याचे काम केले गेले. मालकांना आत्मविश्वास होता, कारभार स्वच्छ होता मग अर्ज बाद का केले? होऊ द्यायची लढाई, उमेदवार लढले असते, १२ हजार सभासदांनी निर्णय घेतला असता. उमेदवारांना निवडणुकीत उभेच राहू द्यायचे नाही हे षडयंत्र करण्याची गरज होती असं मला वाटत नाही असा आरोपही सतेज पाटलांनी केला. 

दरम्यान, या जिल्ह्यात महाडिकांनी दहशतीचं, गुंडगिरीचं राजकारण केले, २५ वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. कदाचित पहिल्यांदा ताकदीने त्यांच्याविरोधात खंबीरपणे कोण लढत असेल तर ती लढाई मीच लढतोय. बंटी पाटलांचे उपकार २००५ साली मी आमदार होतो हे वडिलांना आणि आईंना जाऊन विचार, मग माझ्या विरोधात बोलण्याचे धाडस तुझे होणार नाही असा इशारा अमोल महाडिक यांना इशारा दिला.

महाडिक विश्वासघातकी२०१४ ची निवडणूक मुन्ना महाडिकांची बघितली, राष्ट्रवादीसोबत लढतोय, मोदी लाटेत कुठल्याही परिस्थितीत खासदार निवडून आले पाहिजे तेव्हा सर्वकाही विसरून त्यांना खासदार बनवले. लोकसभेत सहकार्य केले आणि ऑक्टोबरमध्ये माझ्याविरोधात उमेदवार देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मदत केलेल्या माणसाला ताबडतोब पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महाडिक करतात. माझ्यासारख्याला फसवतात तर सभासदांनाही जाता जाता फसवतील. या जिल्ह्यात एक असा माणूस नसेल ज्यांचा विश्वासघात महाडिकांनी केला नसेल असं सतेज पाटलांनी म्हटलं. 

...तर १ लाख बक्षीस देऊज्या पायरीवरून हे वरती गेले त्या पायरीला लाथ मारायचं काम महाडिकांनी केले. प्रत्येकाला वापरून घेण्याचं काम महाडिकांनी केले. जे तत्व मला पटले नाही त्यामुळे गेल्या १० वर्षापासून सातत्याने त्यांच्याविरोधात लढा देतोय. हा जिल्हा स्वाभिमानी आहे. कुणाच्या मागे जाणारा नाही. सामान्य माणसाचा विश्वास मिळवायचं काम बंटी पाटलांनी केले आहे. तुमचे कर्तृत्व काय? २८ वर्ष राजाराम कारखाना तुम्ही ताब्यात ठेवला? १० सभासदांची घरे ओळखावी १ लाख रूपये बक्षीस देतो. संचालक वारला तरी त्याच्या घरी भेटायला गेले नाहीत. सभासदांना न्याय का दिला नाही? असा सवालही सतेज पाटलांनी सभेत विचारला. 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर