शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूर : ‘उज्ज्वला’चे उर्वरित ३० हजार लाभार्थी मार्चपर्यंत पूर्ण करणार: अलोक कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:02 IST

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिली आहे. आता १८ डिसेंबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, मार्चपर्यंत उर्वरित ३० हजार जणांना गॅस जोडणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे ‘उज्ज्वला’चे उर्वरित ३० हजार लाभार्थी मार्चपर्यंत पूर्ण करणार: अलोक कुमारआतापर्यंत १ लाख ४५ हजार जणांना गॅस जोडणी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिली आहे. आता १८ डिसेंबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, मार्चपर्यंत उर्वरित ३० हजार जणांना गॅस जोडणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार यांनी  पत्रकार परिषदेत दिली.अलोक कुमार म्हणाले, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मार्चपर्यंत ‘बीपीएल’ कुटुंबांच्या महिला सदस्यांना पाच कोटी गॅस जोडणी कनेक्शन आणि मार्च २०२० पर्यंत अतिरिक्त तीन कोटी गॅस जोडणी करण्यासाठी १२,८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केली आहे. आज या योजनेने पाच कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात येणार असून नवीन ७ वर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वाधिक मागासवर्गीय, टीए आणि एक्स बेट गार्डन जमाती, बेटे तसेच नदीबेटांवर राहणारे लोक यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच पिवळे रेशनकार्ड धारक व गरीब कुटुंबातील लोकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा नवीन निर्णय दिला आहे. ज्या गरीब कुटुंबांना गॅस, स्टोव्ह खरेदी करण्यासाठी प्रथम आगाऊ पैसे भरता येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. यावेळी थोरात गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सागर पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यात १ लाख ४५ हजार गॅस जोडण्याजिल्ह्यात या योजनेंतर्गत ९१ टक्के लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेंतर्गत ‘एचपीसी’ने ८० हजार, ‘बीपीसी’चे ३५ हजार, ‘आयओसी’चे ३० हजार २०० असे मिळून १ लाख ४५ हजार २०० लाभार्थ्यांना गॅस जोडण्या दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर