शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कोल्हापूर : बटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम, चक्का जाम आंदोलनाचा सहावा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 5:51 PM

माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कांदा, बटाट्यांसह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाल्याने त्यांचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम, चक्का जाम आंदोलनाचा सहावा दिवस१२०० कोटींहून अधिक उलाढाल ठप्प; औद्योगिक वसाहतींमधील कामावरही परिणाम

कोल्हापूर : माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कांदा, बटाट्यांसह जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाल्याने त्यांचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात तब्बल १२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. हे आंदोलन आणखी दोन दिवस सुरू राहिल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्हा प्रशासनाने वाहतूकदारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. कच्च्या मालाच्या अभावामुळे तसेच तयार माल पडून राहिल्याने औद्योगिक वसाहतीमधील काम मंदावले आहे.आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉँग्रेसने देशव्यापी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये कोल्हापुरातील लॉरी आॅपरेटर्स असोसिएशननेही उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील १६ हजार ट्रक व १० हजार टेम्पोचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून दररोज किमान ६०० ट्रक साखर देशभरात निर्यात केली जाते; पण वाहतूकदारांनी संप पुकारल्यामुळे सहा दिवसांत साखरेचा उठाव झाला नाही. परिणामी ५००० टन साखर तीन जिल्ह्यांतील गोदामांत पडून आहे. यातून साखर उद्योगाची २०० कोटींची उलाढाल थांबली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात दररोज येणारा भाजीपाला, कांदा-बटाटे, गॅस सिलिंडर, धान्य, पेट्रोल, डिझेल यांवर विपरीत परिणाम झाला आहे. आवक थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. किमान १० दिवस पुरेल इतका धान्यसाठा कोल्हापुरात होता. त्यातील वितरित झाल्याने बाहेरून धान्य आल्याशिवाय गत्यंतर नाही.

रस्त्यावर एकही ट्रक येणार नाही, याची खबरदारी लॉरी असोसिएशनने घेतली आहे. जे ट्रक चोरटी वाहतूक करतील अशा वाहनांतील हवा सोडणे, जाळपोळ करणे, चालकास मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याने ट्रकचालक भीतीने वाहने रस्त्यावर आणत नाहीत.जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र हा देशव्यापी संप असल्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत चक्का जाम आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय वाहनधारकांनी घेतला आहे.

याचा विपरीत परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यावर झाला आहे. कांदे, बटाटे, डाळी व भाजीपाल्याचा तुटवडा असल्याने दरवाढही झाली आहे. सहा दिवसांत जिल्ह्यात बाराशे कोटींहून अधिक उलाढाल मंदावली आहे.

मालाचा पुरवठा नसल्याने कामगार बसून औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमध्ये कच्च्या मालाचा पुरवठा नसल्याने कामगार बसून आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार उद्योजकांच्या अंगावर पडत आहे.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूर